शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आशा वर्कर्स करणार शौचालयांचे सर्र्वेेक्षण

By admin | Updated: January 11, 2017 00:13 IST

जालना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगर पालिका प्रशासन कामाला लागले आहे.

गजेंद्र देशमुख  जालनास्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगर पालिका प्रशासन कामाला लागले आहे. ज्या नागरिकांनी शौचालय बांधले आहेत त्याचे सर्वेक्षण आता आशा वर्कर्स मार्फत होणार आहे. या कामासाठी बिल कलेक्टरचीही मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे नगर पालिकेला शौचालय कामाचा परिपूर्ण अहवाल प्राप्त होणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरात तेरा हजार शौचालये बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी अडीच हजार शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील सुमारे चार हजार दोनशे लाभार्थींना पहिल्या टप्प्याचे सहा हजार प्रमाणे अडीच कोटी रूपयांचे संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात सेफ्टी टँक तर मार्च महिन्यात पूर्ण शौचालयाचे काम पूर्ण झाल्यावर दुसरा हप्ता देण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थीस १७ हजार रूपयांचे अनुदान मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे अनुदान वाटप झाल्याने हे काम गतीने पूर्ण करणार असल्याचे खांडेकर यांनी स्पष्ट केले. मंगळवारी आशा वर्कर्सची बैठक मुख्याधिकाऱ्यांनी घेतली. त्यात शौचालय कामांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नगर पालिकेंतर्गत ५३ आशा वर्कर्स आहेत. ज्या लाभार्थींने अनुदान घेतले आहे त्याची संपूर्ण पाहणी करून माहिती पालिका अधिकाऱ्यांना आशा वर्कर्स देतील. त्यासोबतच जनजागृती करण्याचे कामही होणार आहे. काही सेवाभावी संस्थांचीही याकामी मदत घेण्यात येणार आहे. ३१ मार्चपर्यंत शहर हागणदारी मुक्त होईल असा विश्वास खांडेकर यांनी व्यक्त केला.