शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यानंतर मनपा निधीतून ३९ रस्त्यांचे डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहरातील अनेक प्रमुख रस्ते खराब झाले आहेत. मागील काही वर्षांपासून खराब रस्त्यांची डागडुजीही करायला महापालिका तयार नाही. ...

औरंगाबाद : शहरातील अनेक प्रमुख रस्ते खराब झाले आहेत. मागील काही वर्षांपासून खराब रस्त्यांची डागडुजीही करायला महापालिका तयार नाही. आता ३९ रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यावर ५७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, आठ ते दहा दिवसांत त्यासंबंधीच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

खड्ड्यांचे शहर, अशी प्रतिमा अलीकडे काही वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. राज्य शासनाने तीन टप्प्यांत महापालिकेला निधी दिला. पहिल्या टप्प्यात २४ कोटी, नंतर १०० कोटी, गतवर्षी १५२ कोटी रुपयांचा निधी मिळाला. शासनाच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे व्यापक प्रमाणात करण्यात आली; परंतु अनेक अत्यावश्यक रस्त्यांची कामे राहून गेली होती. या रस्त्यांची कामे महापालिका निधीतून करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या कामांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५७ कोटींची कामे केली जाणार आहेत. या कामांबद्दल शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले की, ५७ कोटींच्या रस्त्यांच्या कामांसाठी निविदा काढण्याची फाइल मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. फाइल मंजूर झाल्यावर येत्या आठ-दहा दिवसांत निविदा काढण्यात येईल. निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यावर रस्त्यांची कामे सुरू केली जातील. सध्या पावसाळा असल्याने कामे सुरू करणे शक्य नाही. पावसाळा संपल्यावरच ही कामे सुरू होतील. सध्या ३९ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून महापालिकेने सिमेंट रस्त्यांची कामे पूर्णपणे बंद केली आहेत.