शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘अस्मितादर्श’ मानवी मूल्यांची साहित्यधारा...

By admin | Updated: January 14, 2017 00:27 IST

लातूर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतीकारी तत्त्वज्ञान साहित्य स्वरुपात मांडण्यासाठी ‘अस्मितादर्श’चा जन्म झाला.

हणमंत गायकवाड लातूरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतीकारी तत्त्वज्ञान साहित्य स्वरुपात मांडण्यासाठी ‘अस्मितादर्श’चा जन्म झाला. मुखवट्याचे साहित्य नाकारुन प्रयोजनमूल्य अन् वास्तववादी साहित्य ‘अस्मितादर्श’ने प्रस्थापित केले. ‘अस्मितादर्श’ ही मानवी मूल्यांची साहित्यधारा आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. ३४ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. गंगाधर पानतावणे म्हणाले, ‘अस्मितादर्श’च्या साहित्यिकांनी केवळ विद्रोह व्यक्त केला नाही. नकारार्थी साहित्य लिहिले नाही. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळाचा हुंकार या साहित्यातून प्रकट झाला. हे साहित्य म्हणजेच दलित साहित्य आहे. दलित हा शब्द जातीवाचक नसून, जाणिवा व्यक्त करणारा शब्द आहे. म्हणून आम्ही दलित साहित्याला ‘क्रांती विज्ञान’ म्हणतो. या क्रांती विज्ञानाला प्रस्थापित करण्यासाठी अस्मितादर्शची वाटचाल गेल्या ५० वर्षांपासून आहे. प्रारंभीच्या काळात मान, अपमान सहन केले. परंतु, ही वाङ्मयीन आणि सांस्कृतिक चळवळ थांबली नाही. मध्यमवर्गीयांच्या कल्पनारंजक साहित्याला चपराक देत वास्तववादी साहित्य आणि तेही बाबासाहेबांच्या क्रांतीकारी तत्त्वज्ञानातून निर्माण झाले. सुरुवातीला कोंडलेले, दबलेले शब्द कवितेतून व्यक्त झाले. माणूसपण नाकारलेल्या व्यवस्थेच्या विरोधात प्रहार आणि मूल्य प्रस्थापित करण्यासाठी विचार या कवितेतून व्यक्त झाला. गुलामी, अप्रतिष्ठेचे जीवन जगण्याची परंपरा नाकारून आम्हाला जगण्याचा अधिकार आहे. या जाणिवा दलित साहित्याने दिल्या. कविता, कथा, कादंबरी, नाटकांतून ज्वलंत अनुभव परिवर्तनवादी लेखकांनी मांडल्याचे ते म्हणाले.