शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग अद्यापही हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 18:38 IST

१ ऑगस्टपासून प्रयोग होणार असल्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांची घोषणा

ठळक मुद्दे विभागीय आयुक्तालयाला निर्णयाची माहितीही नाही राज्याच्या सर्व ठिकाणांवरून ४५० कि़मी.च्या अंतरात औरंगाबाद मध्यवर्ती केंद्र

औरंगाबाद : कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी राज्य शासनाने ३० कोटींची तरतूद केली असून, १ आॅगस्टपासून प्रयोग होणार असल्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले. मात्र, हा प्रयोग कधी होणार, त्याचे रडार कुठे बसविणार, विमान कुठून उडविणार, याची काहीही माहिती विभागीय प्रशासनाकडे नाही. त्यामुळे सध्या तरी प्रयोगाच्या हवेतच गप्पा सुरू असल्याचे दिसते.

आॅगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचे प्रयोग होण्याचे संकेत आहेत; परंतु त्यासाठी प्रशासकीय हालचाली होताना दिसत नाहीत. औरंगाबादमध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगानंतर २०१७ मध्ये सोलापूर येथे केंद्रीय पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने प्रयोगासाठी प्रयत्न झाले होते. सध्या केंद्रीय परवानगीमुळे प्रयोगाची तारीख ठरत नसल्याचे कळते. 

५ जुलैपर्यंत औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात सी-बॅण्ड डॉपलर व रडार दाखल होणार होते. राज्याच्या सर्व ठिकाणांवरून ४५० कि़मी.च्या अंतरात औरंगाबाद मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे औरंगाबाद विमानतळावरून कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी विमान उड्डाण करण्याबाबत निर्णय झालेला आहे.  २०१५ मध्ये औरंगाबाद आणि २०१७ मध्ये सोलापूर येथून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे प्रयत्न झाले. मात्र, त्यातून फारसा लाभ झाला नव्हता. चार वर्षांपूर्वी केलेल्या प्रयोगातून १५ ते २० टक्के पाऊस जास्तीचा पडला होता, असा दावा मदत व पुनर्वसन विभागाने त्यावर्षी केला होता. २०१५ मध्ये औरंगाबाद येथे १०० तासांवर १०० तास मोफत या तत्त्वावर ख्याती वेदर मॉडिफिकेशन या संस्थेला प्रयोगाकरिता २७ कोटी रुपयांचे कंत्राट दिले गेले होते.

निर्णयाबाबत काहीही माहिती नाहीविभागीय आयुक्तालयातीन सूत्रांनी मदत व पुनर्वसन विभागाकडे कृत्रिम पावसाच्या प्रयोगाच्या माहितीसाठी संपर्क केला. प्रयोगाची कुठलीही माहिती नसल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर महसूल विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी विचारले; परंतु त्यांनीही फक्त बातम्या येत असल्याचे सांगितले. तसेच विभागीय आयुक्तालयाला आजवर कुठलाही शासकीय आदेश, माहिती आलेली नाही. रडार कुठे बसविणार, प्रयोग औरंगाबादेतून होणार की सोलापूरमधून याबाबत काहीही माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितले. विभागीय आयुक्तांनीदेखील बातम्यांच्या अनुषंगाने प्रयोग कुठून होणार, याबाबत काही माहिती आल्याचे आयुक्तालयातील संबंधित अधिकाऱ्यांना विचारून माहिती घेतली. 

टॅग्स :RainपाऊसDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार