शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग अद्यापही हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 18:38 IST

१ ऑगस्टपासून प्रयोग होणार असल्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांची घोषणा

ठळक मुद्दे विभागीय आयुक्तालयाला निर्णयाची माहितीही नाही राज्याच्या सर्व ठिकाणांवरून ४५० कि़मी.च्या अंतरात औरंगाबाद मध्यवर्ती केंद्र

औरंगाबाद : कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी राज्य शासनाने ३० कोटींची तरतूद केली असून, १ आॅगस्टपासून प्रयोग होणार असल्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले. मात्र, हा प्रयोग कधी होणार, त्याचे रडार कुठे बसविणार, विमान कुठून उडविणार, याची काहीही माहिती विभागीय प्रशासनाकडे नाही. त्यामुळे सध्या तरी प्रयोगाच्या हवेतच गप्पा सुरू असल्याचे दिसते.

आॅगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचे प्रयोग होण्याचे संकेत आहेत; परंतु त्यासाठी प्रशासकीय हालचाली होताना दिसत नाहीत. औरंगाबादमध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगानंतर २०१७ मध्ये सोलापूर येथे केंद्रीय पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने प्रयोगासाठी प्रयत्न झाले होते. सध्या केंद्रीय परवानगीमुळे प्रयोगाची तारीख ठरत नसल्याचे कळते. 

५ जुलैपर्यंत औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात सी-बॅण्ड डॉपलर व रडार दाखल होणार होते. राज्याच्या सर्व ठिकाणांवरून ४५० कि़मी.च्या अंतरात औरंगाबाद मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे औरंगाबाद विमानतळावरून कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी विमान उड्डाण करण्याबाबत निर्णय झालेला आहे.  २०१५ मध्ये औरंगाबाद आणि २०१७ मध्ये सोलापूर येथून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे प्रयत्न झाले. मात्र, त्यातून फारसा लाभ झाला नव्हता. चार वर्षांपूर्वी केलेल्या प्रयोगातून १५ ते २० टक्के पाऊस जास्तीचा पडला होता, असा दावा मदत व पुनर्वसन विभागाने त्यावर्षी केला होता. २०१५ मध्ये औरंगाबाद येथे १०० तासांवर १०० तास मोफत या तत्त्वावर ख्याती वेदर मॉडिफिकेशन या संस्थेला प्रयोगाकरिता २७ कोटी रुपयांचे कंत्राट दिले गेले होते.

निर्णयाबाबत काहीही माहिती नाहीविभागीय आयुक्तालयातीन सूत्रांनी मदत व पुनर्वसन विभागाकडे कृत्रिम पावसाच्या प्रयोगाच्या माहितीसाठी संपर्क केला. प्रयोगाची कुठलीही माहिती नसल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर महसूल विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी विचारले; परंतु त्यांनीही फक्त बातम्या येत असल्याचे सांगितले. तसेच विभागीय आयुक्तालयाला आजवर कुठलाही शासकीय आदेश, माहिती आलेली नाही. रडार कुठे बसविणार, प्रयोग औरंगाबादेतून होणार की सोलापूरमधून याबाबत काहीही माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितले. विभागीय आयुक्तांनीदेखील बातम्यांच्या अनुषंगाने प्रयोग कुठून होणार, याबाबत काही माहिती आल्याचे आयुक्तालयातील संबंधित अधिकाऱ्यांना विचारून माहिती घेतली. 

टॅग्स :RainपाऊसDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार