शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

व्यवस्था कालबाह्य

By admin | Updated: August 4, 2014 01:56 IST

औरंगाबाद : नागरिकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारामुळे माओवादी निर्माण होत आहेत

औरंगाबाद : नागरिकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारामुळे माओवादी निर्माण होत आहेत. जातीय दंगलीतून दोन समाजात दरी निर्माण होऊन आतंकवादी विचारांना पोषक वातावरण तयार होते आणि आतंकवाद जन्माला येतो. व्यवस्था कालबाह्य झाल्याने हे घडत आहे, असे प्रतिपादन माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केले. औरंगाबाद सामाजिक मंच आणि स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेतर्फे आयोजित ‘सामाजिक सलोखा’ या विषयावर ते रविवारी मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष गायकवाड हे होते. खोपडे पुढे म्हणाले की, गडचिरोली भागात माओवादी वाढण्याचे कारण तेथील नागरिकांच्या मनात आपण व्यवस्थेचे बळी आहोत, अशी भावना निर्माण झाली आहे. १९८४ मध्ये गडचिरोलीतील मुली आणि महिला नवीन व्यक्तीशी बोलत नव्हत्या. सध्या परिस्थिती बदलली आहे. तरुण मुली माओवादी बनत आहेत. याला राजकीय आणि सामाजिक व्यवस्था जबाबदार आहे. देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. हे नियंत्रणात आणणे गरजेचे झाले आहे. ग्रामीण भागाचा विकास अद्यापही झाला नाही. विदेशातील खेडी पाहिल्यानंतर आपण कोठे आहेत, असा प्रश्न निश्चित पडतो. सर्वसमावेशक विकास होणे गरजेचे आहे. भारतानंतर चीन दोन वर्षांनी स्वतंत्र झाला असतानाही विकास अधिक झालेला आहे. धर्म, राजकारण, समाज आणि पोलीस या विषयावर सुरेश खोपडे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे संपूर्ण व्यवस्थेचे चित्रण मांडले. सर्व व्यवस्थेचा समाजावर कसा परिणाम होतो हे प्रेझेंटेशनद्वारे सादर केले. व्यवस्था सक्षमीकरण काळाची गरज असल्याचे नमूद केले.