शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले

By admin | Updated: May 18, 2014 00:38 IST

विठ्ठल भिसे, पाथरी यावर्षी पाथरी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले. यामुळे आगामी गळीत हंगामामध्ये ऊस गाळपासाठी या भागातील दोन्ही खाजगी कारखाने सुरू होणे आवश्यक आहे.

विठ्ठल भिसे, पाथरी यावर्षी पाथरी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले. यामुळे आगामी गळीत हंगामामध्ये ऊस गाळपासाठी या भागातील दोन्ही खाजगी कारखाने सुरू होणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांमध्ये कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने आतापासूनच चिंता वाढू लागली आहे. पाथरी तालुका हा सिंचनाचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जायकवाडीचा डावा कालवा आणि गोदावरी पात्रातील बंधारे या भागातील शेतकर्‍यांचा कल ऊस लागवडीकडे आहे. मागील काही वर्षात ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ऊस गाळपासाठी नाहक त्रास सहन करावा लागलेला आहे. तरी या भागातील ऊस उत्पादक शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. गतवर्षी पाथरी येथील रेणुका शुगर कारखाना सुरू झाला नाही. लिंबा येथील योगेश्वरी शुगर कारखान्याने जेमतेम गाळप केले. गतवर्षी या भागातून मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी बाहेरी कारखान्यांनी नेला. यावर्षी चांगला पाऊस पडल्याने आणि बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकर्‍यांनी महागडी उसाची बियाणे खरेदी करून ऊस लागवड केली आहे. दोन्ही कारखाना कार्यक्षेत्रात ५ लाख मे.टना पेक्षा अधिक ऊस उपलब्ध आहे. हे दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करू शकले तरी या भागात ऊस शिल्लक राहणार आहे. यामुळे कारखाने यावर्षी वेळेच्या आत सुरू होणे आवश्यक आहे. सुरुवातीपासूनच या भागातील शेतकरी पाथरी येथील रेणुका शुगर कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू लागले आहेत. कारखाना व्यवस्थापन आणि प्रशासनातील वाद वेळेच्या आत मिटवून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होईल, अशी अपेक्षाही व्यक्त होऊ लागली आहे. बाहेरील कारखाने कानाडोळा करणार गतवर्षी जिल्ह्यात तसेच जिल्हा बाहेर उसाचे क्षेत्र कमी होते. यामुळे बाहेरील जिल्ह्यातील कारखान्यांनी या भागातील शेतकर्‍यांचा ऊस गाळपास नेला आहे. यावर्षी सर्वच ठिकाणी उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे बाहेरील कारखाने या भागातील शेतकर्‍यांकडे कानाडोळा करणार असल्याचे दिसत आहे. गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी या कारखान्यांनी आपला ऊस गाळपास न्यावा, अशी भावना या भागातील शेतकरी ठेऊन आहे. तालुक्यात बहुतांश उसाचे क्षेत्र १० ते १५ कि.मी.च्या आत आहे.यामुळे या भागातील ऊस बैलगाडी कार्यक्षेत्रातील आहे. रेणुका शुगर कारखान्याला गाळपासाठी वाहनाऐवजी बैलगाडीची यंत्रणा लागत असल्याने उसाची वाहतूकही कमी खर्चात होते. आणि शेतकर्‍यांचा उसही वेळेच्या आत जातो. यामुळे रेणुका शुगर कारखाना सुर होणे शेतकर्‍यांच्या हिताचे आहे आणि आतापासून शेतकर्‍यांचा रेटा कारखाना सुरू होण्यासाठी वाढू लागला आहे.