शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले

By admin | Updated: May 18, 2014 00:38 IST

विठ्ठल भिसे, पाथरी यावर्षी पाथरी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले. यामुळे आगामी गळीत हंगामामध्ये ऊस गाळपासाठी या भागातील दोन्ही खाजगी कारखाने सुरू होणे आवश्यक आहे.

विठ्ठल भिसे, पाथरी यावर्षी पाथरी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले. यामुळे आगामी गळीत हंगामामध्ये ऊस गाळपासाठी या भागातील दोन्ही खाजगी कारखाने सुरू होणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांमध्ये कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने आतापासूनच चिंता वाढू लागली आहे. पाथरी तालुका हा सिंचनाचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जायकवाडीचा डावा कालवा आणि गोदावरी पात्रातील बंधारे या भागातील शेतकर्‍यांचा कल ऊस लागवडीकडे आहे. मागील काही वर्षात ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ऊस गाळपासाठी नाहक त्रास सहन करावा लागलेला आहे. तरी या भागातील ऊस उत्पादक शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. गतवर्षी पाथरी येथील रेणुका शुगर कारखाना सुरू झाला नाही. लिंबा येथील योगेश्वरी शुगर कारखान्याने जेमतेम गाळप केले. गतवर्षी या भागातून मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी बाहेरी कारखान्यांनी नेला. यावर्षी चांगला पाऊस पडल्याने आणि बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकर्‍यांनी महागडी उसाची बियाणे खरेदी करून ऊस लागवड केली आहे. दोन्ही कारखाना कार्यक्षेत्रात ५ लाख मे.टना पेक्षा अधिक ऊस उपलब्ध आहे. हे दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करू शकले तरी या भागात ऊस शिल्लक राहणार आहे. यामुळे कारखाने यावर्षी वेळेच्या आत सुरू होणे आवश्यक आहे. सुरुवातीपासूनच या भागातील शेतकरी पाथरी येथील रेणुका शुगर कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू लागले आहेत. कारखाना व्यवस्थापन आणि प्रशासनातील वाद वेळेच्या आत मिटवून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होईल, अशी अपेक्षाही व्यक्त होऊ लागली आहे. बाहेरील कारखाने कानाडोळा करणार गतवर्षी जिल्ह्यात तसेच जिल्हा बाहेर उसाचे क्षेत्र कमी होते. यामुळे बाहेरील जिल्ह्यातील कारखान्यांनी या भागातील शेतकर्‍यांचा ऊस गाळपास नेला आहे. यावर्षी सर्वच ठिकाणी उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे बाहेरील कारखाने या भागातील शेतकर्‍यांकडे कानाडोळा करणार असल्याचे दिसत आहे. गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी या कारखान्यांनी आपला ऊस गाळपास न्यावा, अशी भावना या भागातील शेतकरी ठेऊन आहे. तालुक्यात बहुतांश उसाचे क्षेत्र १० ते १५ कि.मी.च्या आत आहे.यामुळे या भागातील ऊस बैलगाडी कार्यक्षेत्रातील आहे. रेणुका शुगर कारखान्याला गाळपासाठी वाहनाऐवजी बैलगाडीची यंत्रणा लागत असल्याने उसाची वाहतूकही कमी खर्चात होते. आणि शेतकर्‍यांचा उसही वेळेच्या आत जातो. यामुळे रेणुका शुगर कारखाना सुर होणे शेतकर्‍यांच्या हिताचे आहे आणि आतापासून शेतकर्‍यांचा रेटा कारखाना सुरू होण्यासाठी वाढू लागला आहे.