शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण, पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी शुक्रवारी मध्यरात्री इसारवाडी येथे फुटली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तब्बल ...

औरंगाबाद : जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी शुक्रवारी मध्यरात्री इसारवाडी येथे फुटली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तब्बल २४ तास परिश्रम घेऊन जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले. रविवारी पहाटे ५ वाजता शहरात पाणी आणण्याचे काम सुरू झाले. शनिवारी ज्या वसाहतींना पाणी देता आले नाही त्या वसाहतींना रविवारी पाणी देण्यात येत होते.

शुक्रवारी आणि शनिवारी शहरात फक्त १४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून पाणी येत होते. शहराला ४० ते ४५, सिडको हडको भागाला किमान ४० एमएलडी पाणी मिळत होते. त्यात पाणीपुरवठा करणे अशक्य होत होते. जुन्या शहरात पाणीपुरवठा झाला नाही. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर जलवाहिनीची टेस्टिंग सुरू झाली. जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत पाणी आणण्यासाठी पहाटे ५ वाजले. त्यानंतर जुन्या शहरात पाणी येण्यास सुरुवात झाली. दुपारपर्यंत टाक्या भरण्याचे काम सुरू होते. शनिवारी ज्या वसाहतींना पाणी देता आले नाही त्या वसाहतींना प्राधान्याने पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली. रविवारी ज्या वसाहतींना पाणी देण्याचा दिवस होता त्यांना पाणी देता आले नाही. संबंधित वसाहतींना सोमवारी पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली. पुढील तीन ते चार दिवस काही वसाहतींना कमी दाबाने पाणी येईल, काही ठिकाणी पाण्याचा गॅप पडू शकतो. त्यामुळे संपूर्ण पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे नागरिक घरातच थांबून होते. पाण्याची मागणी वाढलेली असताना शनिवारी आणि रविवारी अनेक वसाहतींना पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे रविवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवर महिला, आबालवृद्ध पाण्यासाठी भटकंती करताना दिसून आले.