शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आपेगावच्या पालखीस परवानगी नाकारली, संस्थान अध्यक्षाचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:05 IST

पैठण : संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी असलेल्या आपेगाव येथून दरवर्षी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर व त्यांच्या मातापित्यांची पालखी पंढरपूरला ...

पैठण : संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी असलेल्या आपेगाव येथून दरवर्षी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर व त्यांच्या मातापित्यांची पालखी पंढरपूरला जात असते. मात्र कोरोनाने गतवर्षीपासून यात आडकाठी आली आहे. यंदा राज्य शासनाने मानाच्या पालख्यांना वारीसाठी परवानगी दिली असताना आपेगावच्या पालखीस परवानगी नाकारल्याने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आम्हाला परवानगी द्या, नसता १२ जुलै रोजी आपेगाव येथील मंदिरात वारकऱ्यांसह आत्मदहन करू, असा इशारा आपेगाव मंदिराचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी दिला आहे.

पैठण तालुक्यातील आपेगाव येथून पंढरपूर आषाढी वारीची गेल्या ८४२ वर्षांपासून परंपरा चालत आली आहे. या पालखीची शासनाच्या गॅझेटमध्येही नोंद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा गतवर्षी खंडीत झाली. यंदा मात्र राज्य शासनाने मानाच्या दिंडीसहित आणखी दोन दिंड्यांना पंढरपूर वारीसाठी परवानगी देताना आपेगावच्या पालखीस परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी पत्रपरिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, वारकरी संप्रदायात मोलाचे स्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीस राज्य शासनाने परवानगी नाकारल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. पालखीस परवानगी मिळविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पत्रव्यवहार केला होता. मात्र, याबाबत दखल घेण्यात आली नाही. यामुळे वारकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आमच्यासोबत १८ जिल्ह्यांतील वारकरी आत्मदहनाचा मार्ग स्वीकारणार असल्याचे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. याबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

शासनाकडे केल्या या मागण्या

ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी शासनाकडे वारीसाठी परवानगी मागताना खालील मागण्या केल्या आहेत.

पायी वारीचे आम्ही समर्थन करीत नाहीत. २५ वारकऱ्यांसह वाहनाने पंढरपूरला जाण्याची परवानगी द्या. पंढरपूर प्रवेश व प्रदक्षिणा नाकारली तरी चालेल, चंद्रभागेत स्नान करून आम्ही परत फिरू असे म्हटले आहे.

चौकट

२ जुलै रोजी झाले औपचारिक प्रस्थान

आपेगाव येथून पालखीचे २ जुलै रोजी पंढरपूर वारीसाठी औपचारिक प्रस्थान झाले असून पालखी आपेगाव येथील मंदिरात मुक्कामी आहे. शासनाने परवानगी दिली तर पालखी १८ जुलै रोजी मोजक्या वारकऱ्यांसह वाहनाने पंढरपूरकडे रवाना होईल. परंतु राज्य सरकारने आपला निर्णय १२ जुलैच्या आत घोषित करावा, अशी भूमिका ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी मांडली.