शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

आणखी एका लाल दिव्याचे वेध!

By admin | Updated: July 24, 2016 00:41 IST

जालना : गेल्या वर्षभरापासून महामंडळांवरील नियुक्त्या रखडल्या आहेत. महत्त्वाचे महामंडळ आपल्याकडेच रहावे, यासाठी शिवसेना व भाजपामध्ये राजकीय संघर्ष सुरु आहे

जालना : गेल्या वर्षभरापासून महामंडळांवरील नियुक्त्या रखडल्या आहेत. महत्त्वाचे महामंडळ आपल्याकडेच रहावे, यासाठी शिवसेना व भाजपामध्ये राजकीय संघर्ष सुरु आहे. आगामी पंधरा दिवसांत या नियुक्त्या जाहीर होण्याची चिन्हे आहेत. शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय सत्कार सोहळ्यात याचीच चर्चा झाली आणि आणखी एक लालदिवा महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळण्याचे वेध लागले आहेत. राज्य मंत्रिमंडळात अर्जुन खोतकर यांचा समावेश झाल्याने त्यांचा शनिवारी सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खा. दानवे यांनी आपला राजकीय प्रवास मांडतानाच केलेल्या कोट्या आणि मारलेल्या राजकीय कोपरखळ्यांनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या राजकीय भावनांना वाट मोकळी करुन दिली. शिवसेना सहसंपर्क प्रमुख शिवाजी चोथे यांनी सर्वांनाच संधी मिळत नसल्याचे सांगून आपणही अजून प्रतीक्षेत असल्याचे कबूल केले. तर बहुप्रतिक्षित असलेल्या महामंडळांवरील नियुक्त्यांवरुन खा. दानवे, आ. राजेश टोपे, राज्यमंत्री खोतकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांना झुकते माप देण्याचा आग्रह केला. तर महामंडळाच्या निमित्ताने अंबेकर यांना भडकावून आमच्यात भांडणं लावू नका, असा इशारा खा. दानवे यांनी आ. टोपेंना दिला. तर रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष ब्रम्हानंद चव्हाण यांनी रिपाइं ज्या पक्षासोबत असते तो पक्ष सत्तेत असतो, असे सांगत आघाडी सरकारच्या काळात कमिट्यांवर आपल्याला नियुक्ती मिळाली होती. मात्र, युती सरकारमध्ये अद्याप महामंडळांची यादी जाहीर झाली नाही. आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन आपणही प्रतीक्षेत असल्याचे सांगून टाकले. एकूणच सत्कार सोहळ्यात महामंडळावरील नियुक्त्यांचा विषय सर्वच नेत्यांनी लावून धरत अंबेकर यांच्यासाठी जोरदार बॅटींग केली. खा. दानवे यांनीही जिल्ह्याला आणखी लाल दिवा मिळायला हवा, असे सांगून यात रंग भरला आणि ते प्रदेशाध्यक्ष असल्याने सरकारवर त्यांचा प्रभाव आहे. म्हणूनच भविष्यात महामंडळाच्या रुपाने जिल्ह्याला आणखी एक लाल दिवा मिळण्याचे वेध लागले आहेत. राज्यमंत्री खोतकर यांनीही मंत्री पद मिळण्यापूर्वीच अंबेकर यांना महामंडळ देण्यात यावे, यासाठी पक्षश्रेष्ठीकडे आग्रह धरल्याचे सांगून आपणही जीवलग मित्रासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. भास्कर अंबेकर यांना गुलाब आणि खा. रावसाहेब दानवे यांना झेंडुच्या फुलाची उपमा देऊन दोन्ही फुलांचे महत्त्व खोतकर यांनी अधोरेखित केले. गुलाब सर्वव्यापी, तर झेंडूची पूजा ही दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत केली जाते. म्हणून यालाही महत्त्व असल्याचे सांगत खा. दानवे यांचे राज्याच्या राजकारणात वाढलेले महत्त्व जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे खोतकर म्हणाले.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद आपल्याकडे असल्याने संपूर्ण राज्यात लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे जिल्ह्यातील आमचा खेळ पांगलेला आहे. आता तुम्हीच माझेपण पहा, असे सांगत खा. दानवे यांनी खोतकर यांना जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची एकप्रकारे सूचना केल्याने आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे महत्त्व वाढणार असल्याचे हे संकेत मानले जात आहेत.