शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

आणखी १०० कोटी देण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:20 IST

निधीत चांगली कामे झाल्यास आणखी १०० कोटींचा निधी देण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येत असल्याच्या हालचाली सुरू होताच मनपातील पदाधिकाºयांनी मंगळवारी मुंबई गाठली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १०० कोटी मनपालाच द्या असा आग्रह धरण्यात आला. या निधीत चांगली कामे झाल्यास आणखी १०० कोटींचा निधी देण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.शासनाने दिलेल्या १०० कोटींवरून शहरात जोरदार राजकारण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत तक्रारी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने हा निधी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्याच्या हालचाली सुरू केल्या. याची कुणकुण लागताच महापौर बापू घडामोडे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी तातडीने मुंबई गाठली. मनपाचे पदाधिकारी थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मुंबईत संततधार पाऊस सुरू असल्याने मुख्यमंत्रीही निवांत होते. १०० कोटीतील रस्त्यांवर यावेळी सखोल चर्चा झाली. मनपा पदाधिकाºयांनी निधी मनपालाच द्यावा, अशी विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी ही विनंती मान्य केली. या निधीतून चांगली कामे करा असा सल्ला त्यांनी दिला. ही कामे झाल्यावर आणखी १०० कोटींचा निधी देण्याचे संकेतही त्यांनी चर्चेत दिले.प्रस्ताव सादरविभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राचा शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव मनपा पदाधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. लवकरात लवकर निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी दिली. औरंगाबाद शहरात आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेतला होता. त्यानुसार करोडी शिवारात जमीनदेखील देण्यात आली आहे. महापालिकेने त्यासाठी डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार केला असून, शंभर कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. मुंबईत घडामोडे, बारवाल व माजी महापौर भागवत कराड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपत्ती व्यवस्थापन केंद्राचा प्रस्ताव व डीपीआर सादर केला.