शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

...आणि आरटीओंना समजल्या अडचणी

By admin | Updated: June 22, 2016 00:53 IST

औरंगाबाद : खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसचालकांच्या मनमानी कारभारामुळे अनेकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु अशा ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्याकडे आरटीओ प्रशासन साफ दुर्लक्ष करते

औरंगाबाद : खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसचालकांच्या मनमानी कारभारामुळे अनेकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु अशा ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्याकडे आरटीओ प्रशासन साफ दुर्लक्ष करते. मात्र, जेव्हा खुद्द आरटीओंनाही त्याचा फटका बसतो तेव्हा प्रवाशांच्या अडचणींची जाणीव होते. तेव्हा कुठे त्यांनी ट्रॅव्हल्सविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पाऊल उचलले.अनेकदा ट्रॅव्हल्सच्या चालकांकडून मनमानी कारभार केला जातो. त्यातून प्रवाशांना नाहक गैरसोयीला सामोरे जावे लागते. एसी बंद करणे किंवा अचानक एसी वाढविणे, लघुशंका, इतर कारणासाठी बस न थांबविणे अशा समस्यांना अनेकदा प्रवाशांना सामोरे जावे लागते. या प्रकारांची ऐन प्रवासात तक्रार करावी कोठे, असा प्रश्न प्रवाशांसमोर असतो. आरटीओ कार्यालयाकडून खाजगी बसेसविरुद्ध कारवाईकडे दुर्लक्ष केले जाते. एका ट्रॅव्हल्समधून नुकतेच आरटीओंना चालकाच्या गैरवर्तनाचा अनुभव आला. मुंबई येथील बैठकीसाठी ते ट्रॅव्हल्स बसमधून निघाले होते. यावेळी काही प्रवाशांनी महत्त्वाच्या कामासाठी बस थांबविण्याची विनंती चालकाकडे केली. परंतु चालकाने दुर्लक्ष करून काही अंतरावर बस नेऊन थांबविली.प्रवाशांनी विनंती केल्यावरही बस का थांबविली नाही, याबाबत आरटीओंनी चालकाला विचारणा केली. त्यावेळी चालकाने थेट त्यांच्याशीही अरेरावी केली. मुंबईहून परत येताच त्यांनी प्रवाशांबरोबर गैरवर्तन केल्याची तक्रार नोंदवून संबंधित ट्रॅव्हल्सवर कारवाईचा बडगा उगारला.ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना आलेल्या अनुभवानंतर आरटीओंना प्रवाशांच्या व्यथा कळाल्या. परंतु नियमितपणे कारवाई झाल्यास ट्रॅव्हल्सच्या मनमानी कारभारावर कायमचा चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.