शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
2
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
3
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
4
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
5
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
6
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
7
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
8
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
9
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
10
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
11
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
12
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
13
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
14
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
15
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
16
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
17
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
18
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
19
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
20
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
Daily Top 2Weekly Top 5

...आणि तीळगुळाने जुळल्या पुन्हा संसाराच्या गाठी

By admin | Updated: January 17, 2016 00:05 IST

औरंगाबाद : मकरसंक्रांत हा सुवासिनींसाठी महत्त्वाचा सण मानला जातो. एकमेकांमधील कटुता दूर करून नव्या विचारांची जपणूक व आदर करायला शिकविणारा हा सण ‘तीळगूळ’ वाटून साजरा केला जातो.

औरंगाबाद : मकरसंक्रांत हा सुवासिनींसाठी महत्त्वाचा सण मानला जातो. एकमेकांमधील कटुता दूर करून नव्या विचारांची जपणूक व आदर करायला शिकविणारा हा सण ‘तीळगूळ’ वाटून साजरा केला जातो. तीळगूळ, वाणाचे साहित्य देवाला वाहून महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात ती याच दिवशी, पण याच दिवशी पोलिसांत गेलेला वाद मिटवून पती-पत्नी एकत्र आल्याने महिला साह्य कक्षात मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर वाण लुटण्याचा एक अनोखा क्षण पोलीस आयुक्तालयाने अनुभवला.पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण कक्षात जानेवारी महिन्यातील पंधरा दिवसांमध्ये जवळपास १०० अर्ज दाखल झाले आहेत. ताजनापूर (ता. खुलताबाद) येथील मुलगी आणि खामगाव (ता. बदनापूर, जि. जालना) येथील मुलगा यांचे २०१० मध्ये लग्न झालेले आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्ये आहेत. साडेतीन वर्षांपूर्वी पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. प्रकरण विकोपाला जाऊन पोलिसांत दाखल झाले. तब्बल साडेतीन वर्षे पोलीस दोघांचेही समुपदेशन करीत होते; परंतु वेगवेगळे कारण पुढे करून हे दाम्पत्य एकत्र येण्यास टाळाटाळ करीत होते.शुक्रवार, १५ जानेवारी २०१६ रोजी या प्रकरणाची सुनावणी ठेवण्यात आली होती. पोलिसांनी तळमळीने सुखाच्या संसारासाठी तुमच्या दोघांचेही योगदान किती महत्त्वाचे आहे, हे पटवून सांगितले. त्यानंतर हे दाम्पत्य एकत्र येण्यासाठी राजी झाले. ऊसतोड मजूर असलेला पती पोलिसांच्या समुपदेशानंतर अतिशय प्रगल्भपणे बोलत होता. यासाठी महिला तक्रार निवारण कक्षातील पोलीस निरीक्षक शिनगारे, जमादार सुभाष चव्हाण, शकिला पठाण यांनी प्रयत्न केले.असा प्रकार दुसऱ्या एका दाम्पत्याबाबत घडला. आजारी असलेल्या नणंदेला डबा करून देण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या या दाम्पत्याचा चार महिन्यांपूर्वीच म्हणजे लग्नानंतर दोनच महिन्यात हा वाद पोलिसांत आला. शुक्रवारी तक्रार निवारण कक्षातील कर्मचाऱ्यांनी या दाम्पत्यामध्ये समेट घडवून आणली.मकरसंक्रांत या सणाला महिला मंदिरात जाऊन तीळगूळ, वाणाचे साहित्य म्हणजे पेरू, बोरं, ऊस, ज्वारी, कापूस इ. सारखे साहित्य बोळक्यांमध्ये घालून झाकून हे वाण लुटतात. पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि कुटुंबियांवर सुख-समाधानाची छाया कायम राहावी म्हणून महिला उपवास ठेवतात.