शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

...आणि तीळगुळाने जुळल्या पुन्हा संसाराच्या गाठी

By admin | Updated: January 17, 2016 00:05 IST

औरंगाबाद : मकरसंक्रांत हा सुवासिनींसाठी महत्त्वाचा सण मानला जातो. एकमेकांमधील कटुता दूर करून नव्या विचारांची जपणूक व आदर करायला शिकविणारा हा सण ‘तीळगूळ’ वाटून साजरा केला जातो.

औरंगाबाद : मकरसंक्रांत हा सुवासिनींसाठी महत्त्वाचा सण मानला जातो. एकमेकांमधील कटुता दूर करून नव्या विचारांची जपणूक व आदर करायला शिकविणारा हा सण ‘तीळगूळ’ वाटून साजरा केला जातो. तीळगूळ, वाणाचे साहित्य देवाला वाहून महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात ती याच दिवशी, पण याच दिवशी पोलिसांत गेलेला वाद मिटवून पती-पत्नी एकत्र आल्याने महिला साह्य कक्षात मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर वाण लुटण्याचा एक अनोखा क्षण पोलीस आयुक्तालयाने अनुभवला.पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण कक्षात जानेवारी महिन्यातील पंधरा दिवसांमध्ये जवळपास १०० अर्ज दाखल झाले आहेत. ताजनापूर (ता. खुलताबाद) येथील मुलगी आणि खामगाव (ता. बदनापूर, जि. जालना) येथील मुलगा यांचे २०१० मध्ये लग्न झालेले आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्ये आहेत. साडेतीन वर्षांपूर्वी पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. प्रकरण विकोपाला जाऊन पोलिसांत दाखल झाले. तब्बल साडेतीन वर्षे पोलीस दोघांचेही समुपदेशन करीत होते; परंतु वेगवेगळे कारण पुढे करून हे दाम्पत्य एकत्र येण्यास टाळाटाळ करीत होते.शुक्रवार, १५ जानेवारी २०१६ रोजी या प्रकरणाची सुनावणी ठेवण्यात आली होती. पोलिसांनी तळमळीने सुखाच्या संसारासाठी तुमच्या दोघांचेही योगदान किती महत्त्वाचे आहे, हे पटवून सांगितले. त्यानंतर हे दाम्पत्य एकत्र येण्यासाठी राजी झाले. ऊसतोड मजूर असलेला पती पोलिसांच्या समुपदेशानंतर अतिशय प्रगल्भपणे बोलत होता. यासाठी महिला तक्रार निवारण कक्षातील पोलीस निरीक्षक शिनगारे, जमादार सुभाष चव्हाण, शकिला पठाण यांनी प्रयत्न केले.असा प्रकार दुसऱ्या एका दाम्पत्याबाबत घडला. आजारी असलेल्या नणंदेला डबा करून देण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या या दाम्पत्याचा चार महिन्यांपूर्वीच म्हणजे लग्नानंतर दोनच महिन्यात हा वाद पोलिसांत आला. शुक्रवारी तक्रार निवारण कक्षातील कर्मचाऱ्यांनी या दाम्पत्यामध्ये समेट घडवून आणली.मकरसंक्रांत या सणाला महिला मंदिरात जाऊन तीळगूळ, वाणाचे साहित्य म्हणजे पेरू, बोरं, ऊस, ज्वारी, कापूस इ. सारखे साहित्य बोळक्यांमध्ये घालून झाकून हे वाण लुटतात. पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि कुटुंबियांवर सुख-समाधानाची छाया कायम राहावी म्हणून महिला उपवास ठेवतात.