शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

देशाचे निधर्मी स्वरुप बदलण्याचा डाव : आंबेडकर

By admin | Updated: August 13, 2015 00:22 IST

उस्मानाबाद : गुजरात शासनाने पाठ्यपुस्तकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धडा मागे घेतला आहे. या धड्यामध्ये धर्मांतरण तसेच २२ प्रतिज्ञांचा उल्लेख होता.

उस्मानाबाद : गुजरात शासनाने पाठ्यपुस्तकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धडा मागे घेतला आहे. या धड्यामध्ये धर्मांतरण तसेच २२ प्रतिज्ञांचा उल्लेख होता. देशातल्या परंपरेचा त्याग कशासाठी केला याची कारणमिमांसाही त्यामध्ये करण्यात आली होती. हा एकप्रकारे देशाचे निधर्मी स्वरुप बदलण्याचा डाव असल्याचा आरोप भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.बुधवारी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह डॉ. भारत पाटणकर, कॉ. सुबोध मोरे तसेच डाव्या चळवळीतील पदाधिकारी, नेत्यांनी तालुक्यातील अनसुर्डा गावास भेट देवून पिडीत कुटुंबियांशी चर्चा केली. त्यानंतर ते ‘लोकमत’शी संवाद साधत होते. या देशाला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. गौतम बुद्धही याच परंपरेतील होते. मागील काही वर्षांपासून संतांची परंपरा नाकारण्याचा प्रयत्न काही संस्था तसेच धार्मिक संघटना जाणीवपूर्वक करीत असून, देशाची असलेली निधर्मी ओळख पुसून देशाला वैदिक हिंदू राष्ट्र दाखविण्याचा डाव यामागे असल्याचा ते म्हणाले. गुजरात शासनाने डॉ. आंबेडकरांचा पाठ्यपुस्तकातील धडा वगळून यात आता शासनही सहभागी होत असल्याचे दाखवून दिल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. या प्रकाराबाबत गुजरातमध्ये तेथील संघटना आंदोलन उभारत असून, हा प्रश्न आम्ही लोकांमध्ये घेऊन जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. या प्रकारावरुन शासनाने फॅसिझमकडे सुरुवात केली असल्याचा आरोप करीत, आम्हाला पाहिजे ते मान्य आणि आम्हाला मान्य तेच तुम्ही मान्य केले पाहिजे, अशी हुकूमशाही वृत्ती यामागे असल्याचे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. अशा पद्धतीच्या हुकूमशाही वृत्तीशी लढण्याशी लोक जागृती महत्वाची असून, यासाठीच यापुढील काळात काम करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.अनसुर्डा येथील अत्याचार प्रकरण गंभीर आहे. आम्ही सांगतो तेच तुम्ही ऐकले पाहिजे, अशा पद्धतीची मनोवृत्ती तेथे दिसून आली. याप्रकरणामध्ये संपूर्ण गावाचा सहभाग नसून, त्या गावातील काही मोजकी मंडळी या कष्टकरी कुटुंबियांचा छळ करीत आहेत. याच मोजक्या मंडळीच्या दबावाखाली तेथील पिडित ११ कुटुंबासह गावातील इतर कुटुंबेही असून, याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. धार्मिक भावना रुजविण्यासाठी मुस्लिमांना तर जातीची भावना समाजात रुजविण्यासाठी दलितांना टार्गेट केले जात आहे. सदर गावातील प्रकार काही महिन्यांपासून सुरु असताना मुख्यमंत्र्यांसह एकाही मंत्र्याने तेथे भेट दिलेली नाही. हा प्रकार दुर्दैैवी असल्याचे ते म्हणाले.