शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आंबेडकरी तत्त्वज्ञान मांडणीमध्ये नव्या विचारवंतांकडून भेसळ !

By admin | Updated: January 16, 2017 00:57 IST

लातूर : अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी रात्री उशिरा झाला.

लातूर : आंबेडकरी तत्त्वज्ञान हे परिपूर्ण तत्त्वज्ञान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाश्चिमात्य देशात शिकल्यामुळे त्यांच्यावर तेथील विचारवंतांचा प्रभाव असल्याचे सांगून त्यांचे तत्त्वज्ञान मार्क्सवादाशी निगडीत असल्याची मांडणी नवे विचारवंत करतात. मात्र ते खोटे असून, या नव्या विचारवंतांनी सखोल अभ्यास करून आंबेडकरी तत्त्वज्ञान मांडावे, असे मत ज्येष्ठ विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांनी येथे रविवारी व्यक्त केले. अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी रात्री उशिरा झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर अस्मितादर्शचे संस्थापक डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. कृष्णा किरवले, स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ताराचंद्र खांडेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ ग्रंथांचा अभ्यास न करता वरवरचे संदर्भ देऊन मांडणीमध्ये भेसळ होत आहे. त्यामुळे नव्या विचारवंतांनी मूळ ग्रंथांचा सखोल अभ्यास करून मांडणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. प्रास्ताविक प्रा. सुधीर अनवले यांनी केले़ आभार प्रा. जयप्रकाश हुमणे यांनी मानले.