शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईचे पाणी पळविले

By admin | Updated: November 16, 2014 23:40 IST

अविनाश मुडेगावकर ,अंबाजोगाई शहरावर जलसंकट घोंगावत असताना शनिवारी रात्री धनेगाव धरणाच्या डाव्या कालव्यावरील चार बॅरेजेसमधील पाणी लातूरकडे सोडण्यात आले.

अविनाश मुडेगावकर ,अंबाजोगाईशहरावर जलसंकट घोंगावत असताना शनिवारी रात्री धनेगाव धरणाच्या डाव्या कालव्यावरील चार बॅरेजेसमधील पाणी लातूरकडे सोडण्यात आले. अंबाजोगाईचे पाणी पळविल्यामुळे संताप व्यक्त केला जात असून आता पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ येणार आहे.देवळा, अकोला, वांगदरी, कारसा पोहरेगाव येथील बॅरेजेसमधील पाणी सोडण्यात आले आहे. तब्बल १.८३ द.ल.घ.मि. पाणी सोडल्यामुळे अंबाजोगाईवरील जलसंकटात आता भरच पडणार असल्याचे चित्र आहे. या बॅरजेसमुळे साठविलेल्या पाण्यावर परिसरातील विहिरी व विंधन विहिरी सुस्थितीत चालत होत्या. टँकरद्वारे पाणीपुरवठा करणेही सुकर होते. मात्र आता पाणी सोडल्याने आगामी काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. सध्या नोव्हेंबर महिना सुरू आहे. आणखी अर्धा हिवाळा व संपूर्ण उन्हाळा बाकी आहे. अशा स्थितीत अंबाजोगाईकरांचे हक्काचे पाणी लातूरने पळविल्यामुळे शेतकऱ्यातही नाराजी आहे. बॅरेजेसमध्ये साठविलेल्या पाण्यामुळे गुरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. आता पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.मांजरा धरणाच्या उभारणीसाठी केज, अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. या धरणामुळे दोन्ही तालुके सिंचनाखाली येतील, अशी अपेक्षा होती. मात्र धरणातील पाणी लातूर जिल्ह्यासाठी आरक्षित केले जाते. जमिनी आमच्या अन् फायदा लातुरकरांना का? असा सवाल तडोळा येथील शेतकरी अशोक कदम यांनी उपस्थित केला. हक्काचे पाणी कोणी पळवत असेल ते कदापि सहन करणार नाही. अंबाजोगाईला आधी प्राधान्य द्यायला हवे होते. या घटनेचा आम्ही निषेध करतो. याबाबत शासन दरबारी दाद मागणार असल्याचे राकाँचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा म्हणाले.मांजरा धरण डावा कालव्याचे सहायक अभियंता उत्रेश्वर बिराजदार म्हणाले, कालव्यातील पाणी लातूर महापालिकेने पिण्यासाठी आरक्षित केले होते. लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ते सोडण्यात आले आहे. पाणी पळविले असे म्हणता येणार नाही.