शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

अंबाजोगाईचे पाणी पळविले

By admin | Updated: November 16, 2014 23:40 IST

अविनाश मुडेगावकर ,अंबाजोगाई शहरावर जलसंकट घोंगावत असताना शनिवारी रात्री धनेगाव धरणाच्या डाव्या कालव्यावरील चार बॅरेजेसमधील पाणी लातूरकडे सोडण्यात आले.

अविनाश मुडेगावकर ,अंबाजोगाईशहरावर जलसंकट घोंगावत असताना शनिवारी रात्री धनेगाव धरणाच्या डाव्या कालव्यावरील चार बॅरेजेसमधील पाणी लातूरकडे सोडण्यात आले. अंबाजोगाईचे पाणी पळविल्यामुळे संताप व्यक्त केला जात असून आता पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ येणार आहे.देवळा, अकोला, वांगदरी, कारसा पोहरेगाव येथील बॅरेजेसमधील पाणी सोडण्यात आले आहे. तब्बल १.८३ द.ल.घ.मि. पाणी सोडल्यामुळे अंबाजोगाईवरील जलसंकटात आता भरच पडणार असल्याचे चित्र आहे. या बॅरजेसमुळे साठविलेल्या पाण्यावर परिसरातील विहिरी व विंधन विहिरी सुस्थितीत चालत होत्या. टँकरद्वारे पाणीपुरवठा करणेही सुकर होते. मात्र आता पाणी सोडल्याने आगामी काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. सध्या नोव्हेंबर महिना सुरू आहे. आणखी अर्धा हिवाळा व संपूर्ण उन्हाळा बाकी आहे. अशा स्थितीत अंबाजोगाईकरांचे हक्काचे पाणी लातूरने पळविल्यामुळे शेतकऱ्यातही नाराजी आहे. बॅरेजेसमध्ये साठविलेल्या पाण्यामुळे गुरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. आता पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.मांजरा धरणाच्या उभारणीसाठी केज, अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. या धरणामुळे दोन्ही तालुके सिंचनाखाली येतील, अशी अपेक्षा होती. मात्र धरणातील पाणी लातूर जिल्ह्यासाठी आरक्षित केले जाते. जमिनी आमच्या अन् फायदा लातुरकरांना का? असा सवाल तडोळा येथील शेतकरी अशोक कदम यांनी उपस्थित केला. हक्काचे पाणी कोणी पळवत असेल ते कदापि सहन करणार नाही. अंबाजोगाईला आधी प्राधान्य द्यायला हवे होते. या घटनेचा आम्ही निषेध करतो. याबाबत शासन दरबारी दाद मागणार असल्याचे राकाँचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा म्हणाले.मांजरा धरण डावा कालव्याचे सहायक अभियंता उत्रेश्वर बिराजदार म्हणाले, कालव्यातील पाणी लातूर महापालिकेने पिण्यासाठी आरक्षित केले होते. लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ते सोडण्यात आले आहे. पाणी पळविले असे म्हणता येणार नाही.