शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

अधिष्ठातापदासाठी पूर्वीचेच दावेदार रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:04 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३ संवैधानिक अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यापीठ वर्धापनदिनाच्या अगोदर ही ...

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३ संवैधानिक अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यापीठ वर्धापनदिनाच्या अगोदर ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. तथापि, सामाजिकशास्त्रे विद्याशाखेच्या अधिष्ठातापदासाठी यापूर्वीच्याच प्राध्यापकांनी पुन्हा यावेळी अर्ज केले आहेत.

कुलगुरुपदाची सूत्रे घेतल्यानंतर डॉ. प्रमोद येवले यांनी गेल्या वर्षी लॉकडाऊन लागण्यापूर्वी १५ मार्च २०२० रोजी प्राप्त उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार पूर्णवेळ कुलसचिव, ४ अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक आणि उस्मानाबाद उपपरिसर संचालक अशा ७ संवैधानिक अधिकाऱ्यांची नेमणूक केली. यापैकी सामाजिकशास्त्रे विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यावरील संशोधक विद्यार्थ्याकडे पैशाची मागणी करणारा आरोप सिद्ध झाल्यामुळे ३ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांना अधिष्ठाता पदावरून निष्काशित करण्यात आले. दुसरीकडे, नवोन्मेष व नवोपक्रम (इन्क्यूबेशन सेंटर) विभागाचे संचालक संतोष व्यास यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये हे पद सोडले, तर एप्रिल २०१७ पासून विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक पदाचा कार्यभार प्रभारीच आहे.

या तीन पदांच्या भरतीसाठी विद्यापीठाने १२ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. १४ जूनपर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आणि २२ जूनपर्यंत विद्यापीठात हार्डकॉपी सादर करण्याची मुदत होती. त्यानुसार अधिष्ठाता पदासाठी ७ अर्ज, इन्क्यूबेशन सेंटर संचालकपदासाठी १८ अर्ज, विद्यार्थी विकास मंडळ संचालकपदासाठी १० अर्ज असे एकूण ३५ अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये सामाजिकशास्त्रे विद्याशाखेच्या अधिष्ठातापदाच्या भरतीसाठी गत वर्षी अर्ज करणारी प्राध्यापक मंडळी पुन्हा यावेळीही रांगेत आहेत. सध्या अर्जांची छाननी सुरू असून साधारणपणे पुढील महिन्यापर्यंत विद्यापीठ वर्धापन दिनाअगोदर ही भरतीप्रक्रिया पूर्ण होईल, असा मानस विद्यापीठाच्या अधिकृत सूत्राने व्यक्त केला आहे.

चौकट......

रखडलेल्या भरती प्रक्रियेला गती

उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गेल्या वर्षी संवैधानिक अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी हिरवा कंदील दाखविला होता. यंदा प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी अनुकूलता दर्शविली आहे. तथापि, या तीन संवैधानिक अधिकारीपदाच्या भरतीच्या माध्यमातून विद्यापीठात रखडलेल्या भरती प्रक्रियेला गती मिळेल, असा आशावाद विद्यार्थी संघटना व कर्मचारी संघटनांनी व्यक्त केला आहे.