शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

पीक कर्जाचे संथगतीनेच वाटप

By admin | Updated: August 21, 2014 01:19 IST

जालना : खरीप हंगामासाठी जिल्ह्याला पीक कर्ज वाटप करण्यासाठी ७९७ कोटी रुपयांचे उद्दिष्टे असले तरी विविध बँकांनी अद्यापही फक्त ४९१ कोटी ५० लाख रूपयाचे वाटप केले आहे.

जालना : खरीप हंगामासाठी जिल्ह्याला पीक कर्ज वाटप करण्यासाठी ७९७ कोटी रुपयांचे उद्दिष्टे असले तरी विविध बँकांनी अद्यापही फक्त ४९१ कोटी ५० लाख रूपयाचे वाटप केले आहे. त्याची सरासरी ६२ टक्के एवढी आहे. जिल्ह्यात अद्याप एकही नदी - नाल्याला पूर जाईल, असा पाऊस झाला नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्ज देण्यात येत आहे. परंतु बँकांच्या अडेलवृत्तीमुळे आणि उदसिनतेमुळे अद्यापही जिल्हात पीककर्ज देण्याला म्हणावी तशी गती आली नाही. पीक कर्जासंदर्भात लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित केले. त्याची पालकमंत्र्यांनी दखल घेत शेतकऱ्यांना तात्काळ पीककर्ज देण्यात यावे, अशा बँकाना सूचना केल्या. परंतु अद्यापही कर्जाची गती पुढे सरकत नसल्याने शेतकरी दररोज बँकांचे खेटे मारत असल्याचे चित्र आहे.सर्व बँकाना पिककर्जाची गती वाढविण्यासाठी सांगण्यात आले आहे. येत्या महिन्याभरात संपूर्ण उद्दिष्टाच्या जास्त पिककर्ज वाटप करण्याचे आमचे उद्दिष्टे असल्याचे अग्रणी बँकेचे उपव्यवस्थापक महेश बोरूडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)या जिल्ह्यातील खाजगी बॅँकांनी आतापर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांना २१ कोटी ६० लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना २२ कोटी १५ लाख एवढे पीक कर्जाचे वितरण केले आहे. त्याची टक्केवारी १०३ टक्के एवढी आहे. त्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती बॅँक पिछाडीवर आहे. या बॅँकेस यावर्षी १२० कोटी ८० लाख रुपयांच्या पीक कर्जांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु या बॅँकेने केवळ ६७ कोटी १ लाख रुपयांचेच पीक कर्ज वितरीत केले असल्याची माहिती बॅँकेच्या सूत्रांनी दिली. ४दरम्यान, जिल्हा बॅँकेच्या या संथ गतीने सुरु असणाऱ्या पीक कर्जाच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले असताना शेतकऱ्यांचा आर्थिक कना ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बॅँकेकडून पीक कर्जाचे मुदतीच्या आतच वितरण पूर्ण होईल, असे अपेक्षित होते.