शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

आघाडीपेक्षा युतीलाच दुभंगल्याचा फटका

By admin | Updated: September 30, 2014 01:27 IST

परभणी: राज्याच्या राजकारणातील इतिहासामध्ये २०१४ च्या निवडणुकीतील सर्वाधिक धक्कादायक घटना ठरलेल्या शिवसेना- भाजपा युती तुटण्याच्या व काँग्रेस- राष्ट्रवादी

परभणी: राज्याच्या राजकारणातील इतिहासामध्ये २०१४ च्या निवडणुकीतील सर्वाधिक धक्कादायक घटना ठरलेल्या शिवसेना- भाजपा युती तुटण्याच्या व काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी दुभंगल्याचा आघाडीपेक्षा युतीलाच फटका अधिक बसणार असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणामधून समोर आले आहे. शिवसेना- भाजपाची २५ वर्षांची युती व काँग्रेस- राष्ट्रवादीची १५ वर्षांची आघाडी २५ सप्टेंबर रोजी तुटली. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या मदतीने चारही पक्षांनी सत्तेतील पदे हस्तगत केली. परंतु, महत्वाकांक्षा वाढल्याने एकमेकाला कमी लेखण्याचा प्रयत्न झाला. यातूनच अंतर्गत धुसफूस वाढली परिणामी आघाडी व युती तुटली. त्यामुळे चारही पक्षातील कार्यकर्ते संभ्रमात पडले असून ‘आयाराम-गयाराम’ची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली. या सर्व पार्श्वभूमीवर २०१४ ची विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढत असल्याने बहुमत कोणाला मिळेल, हे सांगणे कठीण आहे.आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीला एकमेकांचे कमजोर दुवे माहित आहेत. तर शिवसेना- भाजपाला त्यांच्यामधील अंतर्गत कमकुवत बाजू माहिती आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया झाली. त्यानंतर सोमवारी अर्जांची छाननी ही झाली. आता १ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा धडाडतील. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतील. या सर्व पार्श्वभूमीवर नेहमीच चर्चिला जाणारा विषय म्हणजे काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी का तुटली? शिवसेना-भाजपाची युती का दुभंगली? याला जबाबदार कोण? या सर्व अनुषंगाने ‘लोकमत’ने सोमवारी परभणी शहरात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या निकालाअंती परभणीकरांनी आघाडी व युती तुटल्याचा सर्वाधिक फटका युतीलाच बसणार असल्याचे सांगितले. यामध्ये १६ टक्के नागरिकांनी शिवसेनेला तर ३६ टक्के नागरिकांनी भाजपाला व ४८ टक्के नागरिकांनी दोन्ही पक्षाला फटका बसणार असल्याचे सांगितले. हाच प्रश्न आघाडीबाबत केला असता ४२ टक्के लोकांना काँग्रेसला आघाडी दुभंगल्याचा फटका बसेल, असे वाटते. तर ४२ टक्के लोकांना दोन्ही पक्षांना फटका बसेल, असे वाटते. १६ टक्के नागरिकांनी राष्ट्रवादीला फटका बसणार असल्याचे सांगितले. २५ वर्षांची शिवसेना-भाजपाची युती तुटण्यास कोण कारणीभूत आहे ? असा सवाल केला असता केवळ १० टक्के नागरिकांनी शिवसेनेला जबाबदार धरले तर ४४ टक्के नागरिकांनी भाजपाला व ४६ टक्के नागरिकांनी दोघांनाही जबाबदार धरले. हाच प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत विचारण्यात आला असता २६ टक्के नागरिकांनी काँग्रेसला जबाबदार धरले तर ३८ टक्के नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आणि ३६ टक्के नागरिकांनी दोन्ही पक्षांना जबाबदार धरले. युती तुटल्याचे मुख्य कारण ४२ टक्के लोकांना मुख्यमंत्रीपद वाटते तर ३० टक्के लोकांना जागा वाटप हे कारण वाटते. २८ टक्के नागरिक दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव नसल्याने युती तुटल्याचे सांगतात. काँग्रेस-राष्ट्रवादीबाबतही असाच सवाल केला असता ४० टक्के नागरिकांना जागा वाटप हे कारण वाटते. तर ३४ टक्के लोकांना मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली असल्याचे वाटते. २६ टक्के नागरिकांना दोन्ही पक्षामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे वाटते. (जिल्हा प्रतिनिधी)