शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

आकाशवाणी ‘चौक’ बंद

By admin | Updated: May 6, 2016 23:59 IST

औरंगाबाद : जालना रोडवरील आकाशवाणी चौकात दररोज सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर बॅरिकेड्स लावून हा चौक बंद केला आहे.

औरंगाबाद : जालना रोडवरील आकाशवाणी चौकात दररोज सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर बॅरिकेड्स लावून हा चौक बंद केला आहे. यामुळे सिडको चौकाकडून बाबा पेट्रोल पंपाकडे जाणारी वाहने आणि बाबा पेट्रोल पंपाकडून सिडको चौकाकडे येणारी वाहने सरळ धावतील. त्यांना येथे कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही; परंतु वाहनचालकांना वळण घ्यायचे असल्यास सेव्हन हिल आणि मोंढा नाका उड्डाणपुलाखालूनच जावे लागणार आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी बॅरिकेड्स लावल्यामुळे येथे चौकासारखी रचना दिसणार नाही.शहराची ‘लाईफ लाईन’ म्हणून जालना रोडची ओळख आहे. शहरात ये-जा करणारी लाखो वाहने याच रस्त्यावरून धावतात. विशेषत: दुचाकीचालकांची या रस्त्यावर मोठी संख्या असते.सायंकाळच्या वेळी वाहनांची संख्या वाढल्यावर हा रस्ता जागोजागी ठप्प झालेला दिसतो. उड्डाणपूल वगळता इतर ठिकाणी नेहमी वाहतुकीची समस्या पाहावयास मिळते. आकाशवाणी चौक, अमरप्रीत हॉटेल चौक, एपीआय कॉर्नर, अग्रसेन चौक, उच्च न्यायालयासमोर आदी ठिकाणी सतत वाहतूक ठप्प झालेली असते. यापैकी आकाशवाणी चौकात वाहतुकीचा खेळखंडोबा झालेला असतो. पोलिसांच्या पाहणीत हा प्रकार आल्यामुळे प्रयोगिक तत्त्वावर येथे बॅरिकेड्स बसविण्यात आले आहेत. यामुळे त्रिमूर्ती चौकाकडून येणाऱ्या वाहनचालकांना सेव्हन हिल उड्डाणपुलाकडे जायचे असल्यास त्यांना आधी मोंढा नाका उड्डाणपुलाखालून वळसा घेऊन यावे लागणार आहे. तसेच स्मशान मारुती रस्त्याकडून आलेल्या वाहनचालकांना जर त्रिमूर्ती चौकाकडे जायचे असेल, तर त्यांना सेव्हन हिल उड्डाणपुलाखालून वळसा घेऊन यावे लागणार आहे. तसेच जालना रोडवरून धावणाऱ्या एखाद्या वाहनचालकाला यू टर्न घ्यायचा असला तरी त्यांना सेव्हन हिल उड्डाणपूल आणि मोंढा नाका उड्डाणपुलाखाली जावे लागणार आहे.