शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अहमदनगरच्या शाळकरी मुलास कोल्हापूरात अमानुष मारहाण

By admin | Updated: June 8, 2017 16:18 IST

पैलवान बनण्यास आलेल्याचा दोघा भावांकडून छळ

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0९ : अहमदनगरहून कोल्हापूरात पैलवान बनण्यासाठी आलेल्या सात वर्षाच्या शाळकरी मुलास दोघा भावांनी अमानुष छळ करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सार्थक नवनाथ गोरे (रा. मिरजगाव, नगर, जि. अहमदनगर) असे जखमी मुलाचे नाव आहे. गरम गॅसवर बसविणे, गुप्तांगावर गरम पाणी ओतणे, डोळ्यावर, छातीवर, पोटावर बेदम मारहाण करणे असे विचित्र प्रयोग त्यांनी केले आहेत. संशयित सूरज (वय १७) व धिरज बारसकर (११ रा. वालवड, ता. भूम, जि. उस्मानाबाद) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही सार्थकचे मित्र आहेत.

अधिक माहिती अशी, सार्थक गोरे याच्या वडीलांचे मूळ गाव चिंचपूरडगे (ता. भूम, जि. उस्मानाबाद) हे आहे. मिरजगाव येथे वेल्डींगचे वर्कशॉप असल्याने ते कुटुंबासह याठिकाणी राहतात. त्यांच्या मूळ गावा शेजारी राहणारे सूरज व धिरज बारसकर हे दोघे भाऊ कोल्हापूरात न्यू मोतीबाग तालमीत मल्ल प्रशिक्षण घेतात. सार्थकचे चुलते जालिंदर दत्तात्रय गोरे हे चिंचपुरडगे याठिकाणी राहतात. त्यांनी सार्थकला दीड महिन्यापूर्वी पैलवान बनण्यासाठी या दोघा भावासोंबत कोल्हापूरला पाठविले. तालमीशेजारील दगडी चाळ येथे तिघेजण खोली घेवून राहत होते.

सार्थक दोन-चार वेळाच तालमीत गेला. त्यानंतर तो गेलाच नाही. या दोघा भावांनी त्याला भांडी घासायला लावणे, झाडलोट करणे अशी कामे लावली. प्रसंगी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचारही केला. त्याला विरोध केल्यास बेदम मारहाण करीत असत. गरम गॅसवर बसविणे, गुप्तांगावर गरम पाणी ओतणे असे विचित्र प्रयोग त्यांनी त्याच्यावर केले. त्याच्या आई-वडीलांचे फोनही त्याला दिले जात नव्हते. बंद खोलीत डांबून त्याच्यावर महिनाभर अत्याचार सुरु होता. त्याची प्रकृती जास्तच गंभीर झाल्यानंतर या दोघा भावांनी त्याला मंगळवार (दि. ६) रोजी सीपीआरमध्ये दाखल केले. त्याच्या आई-वडीलांना याची कल्पनाही दिली नाही.

हा प्रकार गंभीर असल्याने सीपीआरच्या डॉक्टरांनी सार्थकला धिर देत आई-वडीलांचा फोन नंबर मिळविला. त्यांच्याशी संपर्क साधून तत्काळ कोल्हापूरला येण्यास सांगितले. गुरुवारी आई-वडीलांनी सीपीआरमध्ये येवून मुलाची प्रकृती पाहली असता मानसिक धक्काच बसला आहे. सार्थकवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याचे आई-वडील या मानसिक धक्यातून सावरले नसल्याने त्यांनी याप्रकरणी पोलीसांत तक्रार दिलेली नाही.

ठार मारण्याची धमकी

सार्थकवर गेल्या महिनाभरापासून अत्याचार होत होता. या काळात त्याच्या आईचे फोन त्याला येत होते. या दोघा भावांनी आई-वडीलांना सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याने तो भितीने मी चांगला आहे, असे सांगत असे. त्यामुळे आई-वडीलांना तो कोल्हापूरात रुळलाय असेच वाटले होते. बुधवार (दि. ७) रोजी त्याला घरी घेवून जाण्यासाठी आई-वडील येणार होते. परंतु या दोघा भावांनी त्यांना सार्थक अजून आठ दिवस याठिकाणीच थांबणार आहे. तुम्ही येवू नका म्हणून निरोप दिला होता. गुरुवारी आई-वडीलांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी सार्थक व्यायाम करीत नव्हता. त्यामुळे मारहाण केल्याचे सांगत पोलिसात तक्रार करु नका म्हणून हात जोडून विनंती केली. त्यानंतर ते दोघेही गावी निघून गेले.