शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पुन्हा पाच दुचाकी वाहने जाळली

By admin | Updated: January 20, 2015 01:27 IST

वाळूज महानगर : बजाजनगरात माथेफिरू टोळीने रविवारी मध्यरात्री पुन्हा पाच दुचाकी पेटवून दिल्यामुळे वाहनधारकांत चांगलीच खळबळ उडाली आहे.

वाळूज महानगर : बजाजनगरात माथेफिरू टोळीने रविवारी मध्यरात्री पुन्हा पाच दुचाकी पेटवून दिल्यामुळे वाहनधारकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असले तरी पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ही टोळी अजून मोकाटच आहे.बजाजनगरात गेल्या पाच वर्षांपासून दुचाकी व चारचाकी वाहने जाळण्याच्या घटना सुरू आहेत. ही टोळी घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकी बेमालूमपणे जाळून टाकून पसार होत आहे. या टोळीने पोलीस प्रशासनाला एक प्रकारे खुले आव्हान दिले असून, हे आव्हान पेलण्यात पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. रविवारी मध्यरात्री बजाजनगरातील हेमराज विश्वास सनेर (दुचाकी क्रमांक एमएच-२० डीजी १३४३), आनंदा प्रभाकर शंकरवार (दुचाकी क्रमांक एमएच-२० सीएक्स-०२५२), सुरेश अंबुसकर (दुचाकी क्रमांक एमएच-२० सीझेड-८४०४),अमोल काकडे (विनापासिंग ) व गिरीश पाटील (दुचाकी क्रमांक एमएच-१९, बीपी ८१३७ ) या पाच दुचाकींना आग लावून माथेफिरू पसार झाले. रात्री १२.३० ते पहाटे ४.४५ या वेळेत वेगवेगळ्या ठिकाणी पाच दुचाकी जाळण्यात आल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे एमआयडीसी वाळूज पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाकडून रात्रीची गस्त सुरू असतानाही ही टोळी पोलिसांना चकमा देण्यात सतत यशस्वी ठरत असल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पाच दुचाकी जळीतप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघा संशयितांना आज ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून सोडून देण्यात आले.