शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

दोन महिन्यांनंतरही खांब आडवेच

By admin | Updated: May 25, 2014 01:06 IST

तामलवाडी : वादळी वार्‍यासह झालेल्या पावसात तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा शिवारातील विजेचे खांब जमीनदोस्त झाले होते. परंतु, दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही अनेक ठिकाणचे खांब उभारण्यात आलेले नाहीत

 तामलवाडी : वादळी वार्‍यासह झालेल्या पावसात तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा शिवारातील विजेचे खांब जमीनदोस्त झाले होते. परंतु, दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही अनेक ठिकाणचे खांब उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या परिसरातील शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकला नाही. तामलवाडीसह परिसरात मागील दोन महिन्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. या पावसाने पिकांसोबतच वीज कंपनीचेही मोठे नुकसान झाले होते. विजेचे २५० खांब आणि ट्रान्सफार्मर जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, अद्याप वीजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही. सांगवी मार्डी ते काटी जाणार्‍या वीज वाहिनीच्या जोडणीसाठी उभारण्यात आलेले खांबही वादळी वार्‍यात कोसळले आहेत. मात्र, वीज कंपनीकडे कर्मचार्‍यांची कमतरता असल्या कारणाने ही कामे तातडीने होत नसल्याचे समजते. या प्रकरामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. विद्युतपंप बंद असल्यामुळे उसासोबतच अन्य पिकेही अडचणीत आली आहेत. (वार्ताहर)सांगवी काटीसाठी नेमण्यात आलेले वीज कर्मचारी गावात राहात नाहीत. त्यामुळे काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास शेतकर्‍यांना किरकोळ कामे खाजगी व्यक्तींकडून करून घ्यावी लागतात. त्याचा आर्थिक भुर्दंडही शेतकर्‍यांनाच सोसावा लागत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.ट्रान्सफार्मर जोडण्यात आलेल्या खांबावर बसविण्यात आलेल्या डीपींचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. दारे खिळखिळी झाली असल्याने ती सताड उघडी असतात. त्यामुळे अशा डीपींपासून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याकडे वीज कंपनीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.