शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

आत्महत्येनंतर प्रेत ठाण्यात

By admin | Updated: June 24, 2016 01:27 IST

वाळूज महानगर : गत आठवड्यात वाळूज येथे अतिक्रमणाच्या वादातून पेटवून घेतलेल्या एका ५० वर्षीय इसमाचा गुरुवारी उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला

वाळूज महानगर : गत आठवड्यात वाळूज येथे अतिक्रमणाच्या वादातून पेटवून घेतलेल्या एका ५० वर्षीय इसमाचा गुरुवारी उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात यावी, यासाठी त्यांचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला. या प्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे तणाव निवळला.उत्तम भंडारी (५० रा. लायननगर, वाळूज) हे घराशेजारी शौचालयाचे बांधकाम करीत होते. त्यांच्या घराशेजारील सुभाष सोनवणे, कुसुम सोनवणे, किशोर नाडे, आशाबाई चव्हाण, रेखा रोडे, उज्ज्वला डोंगरजाळ व कल्पना म्हस्के यांनी उत्तम भंडारी यांच्याशी वाद घालत बांधकाम थांबविण्यासाठी दबाव आणला होता. यावेळी भंडारी यांनी शेजाऱ्यांना अगोदर सोनवणे या इसमाने अतिक्रमण करून घर बांधले असून त्याचे अतिक्रमण काढा, नंतर माझे अतिक्रमण काढतो असे सांगितले होते. यानंतर उत्तम भंडारी यांनी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी पेटवून घेतले. पत्नी ताराबाई व सून नंदिनी यांनी उत्तम यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.उत्तम ४० टक्के भाजले होते. शासकीय रुग्णालयात त्यांनी शेजाऱ्यांबरोबर झालेल्या वादातून आपण पेटवून घेतल्याचा जबाब दिला होता.उपचारादरम्यान मृत्यूउपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे गावात तणावाचे वातावरण पसरले. या घटनेस जबाबदार असणाऱ्या आरोपींविरुध्द कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा भंडारी यांच्या नातेवाईकांनी घेतला होता.