शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

बालिकेच्या मृत्यूनंतर घाटीत तणाव, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 01:43 IST

औरंगाबाद : थंडीताप आल्याने दोन दिवसांपासून घाटीत उपचार घेत असलेल्या ११ वर्षीय बालिकेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप

औरंगाबाद : थंडीताप आल्याने दोन दिवसांपासून घाटीत उपचार घेत असलेल्या ११ वर्षीय बालिकेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी करून डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे काही काळ घाटीत तणाव निर्माण झाला होता. घाटी प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले. मोनाली सुनील दाभाडे (११,रा. नंदनवन कॉलनी) असे मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, मोनालीची प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी तिला सोमवारी घाटीतील बालरोगशास्त्र विभागात दाखल केले. उपचारासाठी मोनाली स्वत: चालत वॉर्डात गेली होती.वॉर्ड क्रमांक २५ मध्ये तिला दाखल करण्यात आले. या विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील आणि त्यांचे सहकारी हे तिच्यावर उपचार करीत होते. डॉक्टरांच्या सांगण्यावरून नातेवाईकांनी तिची डेंग्यू तपासणी खाजगी प्रयोगशाळेतून करून आणली. प्र्रयोगशाळेच्या अहवालात तिला डेंग्यू नसल्याचे नमूद करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी मोनालीची प्राणज्योत मालवली. हसत खेळत असलेली मोनाली सकाळी शुद्धीवर होती, असे असताना ती मरण पावल्याचे ऐकून नातेवाईकांना धक्काच बसला. डॉ. प्रशांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यानेच मोनाली दगावली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर नातेवाईकांनी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी यांना घेराव घातला. या घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेख सलीम पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले.