शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

बालिकेच्या मृत्यूनंतर घाटीत तणाव, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 01:43 IST

औरंगाबाद : थंडीताप आल्याने दोन दिवसांपासून घाटीत उपचार घेत असलेल्या ११ वर्षीय बालिकेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप

औरंगाबाद : थंडीताप आल्याने दोन दिवसांपासून घाटीत उपचार घेत असलेल्या ११ वर्षीय बालिकेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी करून डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे काही काळ घाटीत तणाव निर्माण झाला होता. घाटी प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले. मोनाली सुनील दाभाडे (११,रा. नंदनवन कॉलनी) असे मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, मोनालीची प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी तिला सोमवारी घाटीतील बालरोगशास्त्र विभागात दाखल केले. उपचारासाठी मोनाली स्वत: चालत वॉर्डात गेली होती.वॉर्ड क्रमांक २५ मध्ये तिला दाखल करण्यात आले. या विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील आणि त्यांचे सहकारी हे तिच्यावर उपचार करीत होते. डॉक्टरांच्या सांगण्यावरून नातेवाईकांनी तिची डेंग्यू तपासणी खाजगी प्रयोगशाळेतून करून आणली. प्र्रयोगशाळेच्या अहवालात तिला डेंग्यू नसल्याचे नमूद करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी मोनालीची प्राणज्योत मालवली. हसत खेळत असलेली मोनाली सकाळी शुद्धीवर होती, असे असताना ती मरण पावल्याचे ऐकून नातेवाईकांना धक्काच बसला. डॉ. प्रशांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यानेच मोनाली दगावली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर नातेवाईकांनी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी यांना घेराव घातला. या घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेख सलीम पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले.