शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

विद्यापीठात एम.फिल.ची प्रवेशप्रक्रिया उद्यापासून

By | Updated: November 22, 2020 09:01 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ‘एम.फिल.’ अभ्यासक्रमासाठी शुक्रवारी ऑनलाईन प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर शनिवारी अवघ्या ...

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ‘एम.फिल.’ अभ्यासक्रमासाठी शुक्रवारी ऑनलाईन प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर शनिवारी अवघ्या २४ तासांच्या आत या परीक्षेचा निकालही जाहीर केला. दरम्यान, २३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांपैकी एकूण १८ विभागांत एम.फिल. अभ्यासक्रमाच्या २३० जागा आहेत. यासाठी शुक्रवारी सकाळी ११ ते २ वाजेदरम्यान ऑनलाईन प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली. ११०८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेला अन्य विभागांच्या तुलनेत राज्यशास्त्र विभागाचे सर्वाधिक १५१ विद्यार्थी, वाणिज्य शास्त्राचे १०८, तर इंग्रजी विभागाच्या १०७ विद्यार्थ्यांनी ‘सीईटी’ दिली. विद्यापीठ कार्यक्षेत्रासह राज्य, तसेच परराज्यातील विद्यार्थ्यांनीदेखील ऑनलाईन ‘सीईटी‘ दिली. प्रवेशित विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी सोमवारी घोषित करण्यात येणार आहे, तर १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष तासिकांना सुरुवात होणार आहे, असे पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके यांनी सांगितले.

विद्यापीठातील १८ विभागांमध्ये एम.फिल. हा अभ्यासक्रम चालतो. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, गणित, कॉमर्स, पाली अ‍ॅण्ड बुद्धिझम, उर्दू, ग्रंथालय व माहितीशास्त्र, संगणकशास्त्र, शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र, जर्नालिझम, एमबीए आदी विभागांचा समावेश आहे.

दरम्यान, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली एम.फिल. प्रक्रियेसंदर्भात शनिवारी बैठक घेण्यात आली. यावेळी प्रकुलगुरू डॉ. शाम शिरसाठ, प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश गायकवाड, परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा आदींची उपस्थिती होती.

चौकट.........

संशोधन प्रक्रियेला चालना देणार

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी कळविले आहे की, विद्यापीठाच्या वतीने संशोधक विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी एम.फिल. प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर ‘पेट’ प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात एम.फिल. अभ्यासक्रम बंद करण्यात आला आहे. तथापि, हे धोरण २०२२ पासून अमलात येणार आहे. एकीकडे बार्टी, सारथी, महाज्योती, युजीसी आदी संस्थांची फेलोशिप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना मिळते. त्यानुसार संशोधक विद्यार्थ्यांची मागणी, तसेच अन्य सर्व बाबींचा विचार करून ‘एम.फिल.’ अभ्यासक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.