शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

विभागातूनच ऑनलाइन तासिका घेण्याचा प्रशासनाचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:05 IST

औरंगाबाद : विद्यापीठातील प्राध्यापकांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन तासिका विभागांतूनच घेण्याचे फर्मान प्रशासनाने सोडले आहे. दरम्यान, विभागात काय आणि घरी ...

औरंगाबाद : विद्यापीठातील प्राध्यापकांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन तासिका विभागांतूनच घेण्याचे फर्मान प्रशासनाने सोडले आहे. दरम्यान, विभागात काय आणि घरी बसून काय. ऑनलाइन तर तासिका घ्यायच्या आहेत. विद्यापीठात नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे घरी बसून ऑनलाइन तासिका घेण्याची परवानगी विद्यापीठाने द्यावी, असा सूर काही प्राध्यापकांनी आळवला आहे.

कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. गेल्या वर्षापासून पावसाळ्यात सुरू होणारे प्रथम सत्र हिवाळ्यात, तर हिवाळ्यात सुरू होणारे द्वितीय सत्र पावसाळ्यात सुरू होत आहे. तथापि, मेमध्ये घेण्यात आलेल्या काही पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र परीक्षेचे निकाल अद्याप लागलेले नाहीत; परंतु दुसऱ्या सत्रातील नियोजित ६४ तासिका पूर्ण झाल्या पाहिजेत, यासाठी विद्यापीठाने ऑनलाइन तासिका सुरू करण्याच्या सूचना प्राध्यापकांना दिल्या आहेत. त्यानुसार जूनच्या १५ तारखेपासून काही विभागांतील प्राध्यापकांनी तासिका सुरू केल्या आहेत; परंतु विद्यापीठातील अनेक विभागांत नेटवर्कमध्ये सातत्याने अडथळे येत आहेत. त्यामुळे विभागांत येऊनच तासिका घ्याव्यात, विद्यापीठ प्रशासनाचा हा आग्रह प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी तापदायक ठरला आहे. एक तर विद्यापीठाने सर्व विभागांत सुरळीत चालणारी इंटरनेटची सुविधा द्यावी किंवा प्राध्यापकांना घरी बसून ऑनलाइन तासिका घेण्याची संधी द्यावी, असा सूर प्राध्यापक मंडळीने आळवला आहे.

दुसरीकडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेचे प्रदेश सचिव प्रकाश इंगळे यांनी तर विद्यापीठाच्या ऑनलाइन तासिकांवरच आक्षेप घेतला आहे. विद्यार्थ्यांसाठी अजूनही विद्यापीठ- महाविद्यालये तसेच वसतिगृहे उघडलेली नाहीत. अनेक विद्यार्थी गावाकडेच आहेत. ग्रामीण भागात देखील नेटवर्कच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ऑनलाइन तासिकांमध्ये किती विद्यार्थी सहभागी होतात, याचा विचार प्राध्यापकांनी करायला हवा. ऑनलाइन तासिका घेत असल्याचा दावा अनेक प्राध्यापकांनी केला असला, तरी अनेकांनी एक- दोन तासिका घेतल्यानंतर पुढे त्या घेतलेल्याच नाहीत. याचा हिशेब प्रशासनाने घेतला पाहिजे.

चौकट......

विभागात असुविधा असेल, तर दुरुस्त करू

यासंदर्भात प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले की, विद्यापीठाने सर्व विभागांत संगणक व इंटरनेटची सुविधा दिलेली आहे. प्राध्यापकांनी संगणकावर ऑनलाइन तासिका घ्याव्यात. मोबाइल नेटवर्कचा तासिकांसाठी संबंधच नाही. काही ठिकाणी असुविधा असतील, तर प्राध्यापकांनी त्या निदर्शनास आणून दिल्यास त्या दूर केल्या जातील.