शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विभागातूनच ऑनलाइन तासिका घेण्याचा प्रशासनाचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:05 IST

औरंगाबाद : विद्यापीठातील प्राध्यापकांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन तासिका विभागांतूनच घेण्याचे फर्मान प्रशासनाने सोडले आहे. दरम्यान, विभागात काय आणि घरी ...

औरंगाबाद : विद्यापीठातील प्राध्यापकांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन तासिका विभागांतूनच घेण्याचे फर्मान प्रशासनाने सोडले आहे. दरम्यान, विभागात काय आणि घरी बसून काय. ऑनलाइन तर तासिका घ्यायच्या आहेत. विद्यापीठात नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे घरी बसून ऑनलाइन तासिका घेण्याची परवानगी विद्यापीठाने द्यावी, असा सूर काही प्राध्यापकांनी आळवला आहे.

कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. गेल्या वर्षापासून पावसाळ्यात सुरू होणारे प्रथम सत्र हिवाळ्यात, तर हिवाळ्यात सुरू होणारे द्वितीय सत्र पावसाळ्यात सुरू होत आहे. तथापि, मेमध्ये घेण्यात आलेल्या काही पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र परीक्षेचे निकाल अद्याप लागलेले नाहीत; परंतु दुसऱ्या सत्रातील नियोजित ६४ तासिका पूर्ण झाल्या पाहिजेत, यासाठी विद्यापीठाने ऑनलाइन तासिका सुरू करण्याच्या सूचना प्राध्यापकांना दिल्या आहेत. त्यानुसार जूनच्या १५ तारखेपासून काही विभागांतील प्राध्यापकांनी तासिका सुरू केल्या आहेत; परंतु विद्यापीठातील अनेक विभागांत नेटवर्कमध्ये सातत्याने अडथळे येत आहेत. त्यामुळे विभागांत येऊनच तासिका घ्याव्यात, विद्यापीठ प्रशासनाचा हा आग्रह प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी तापदायक ठरला आहे. एक तर विद्यापीठाने सर्व विभागांत सुरळीत चालणारी इंटरनेटची सुविधा द्यावी किंवा प्राध्यापकांना घरी बसून ऑनलाइन तासिका घेण्याची संधी द्यावी, असा सूर प्राध्यापक मंडळीने आळवला आहे.

दुसरीकडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेचे प्रदेश सचिव प्रकाश इंगळे यांनी तर विद्यापीठाच्या ऑनलाइन तासिकांवरच आक्षेप घेतला आहे. विद्यार्थ्यांसाठी अजूनही विद्यापीठ- महाविद्यालये तसेच वसतिगृहे उघडलेली नाहीत. अनेक विद्यार्थी गावाकडेच आहेत. ग्रामीण भागात देखील नेटवर्कच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ऑनलाइन तासिकांमध्ये किती विद्यार्थी सहभागी होतात, याचा विचार प्राध्यापकांनी करायला हवा. ऑनलाइन तासिका घेत असल्याचा दावा अनेक प्राध्यापकांनी केला असला, तरी अनेकांनी एक- दोन तासिका घेतल्यानंतर पुढे त्या घेतलेल्याच नाहीत. याचा हिशेब प्रशासनाने घेतला पाहिजे.

चौकट......

विभागात असुविधा असेल, तर दुरुस्त करू

यासंदर्भात प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले की, विद्यापीठाने सर्व विभागांत संगणक व इंटरनेटची सुविधा दिलेली आहे. प्राध्यापकांनी संगणकावर ऑनलाइन तासिका घ्याव्यात. मोबाइल नेटवर्कचा तासिकांसाठी संबंधच नाही. काही ठिकाणी असुविधा असतील, तर प्राध्यापकांनी त्या निदर्शनास आणून दिल्यास त्या दूर केल्या जातील.