शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

साताऱ्याबाबत प्रशासन १५ वर्षांपासून झोपेतच

By admin | Updated: December 8, 2014 00:23 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद सातारा-देवळाई नगर परिषद हद्दीतील अवैध आणि अतिरिक्त बांधकामांविरुद्ध मोहीम उघडून ही बांधकामे पाडण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे;

सुनील कच्छवे, औरंगाबादसातारा-देवळाई नगर परिषद हद्दीतील अवैध आणि अतिरिक्त बांधकामांविरुद्ध मोहीम उघडून ही बांधकामे पाडण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे; परंतु ही बांधकामे होत असताना आणि त्याविषयी पुरेशी कल्पना असूनही साताऱ्याबाबत तब्बल पंधरा वर्षे प्रशासन झोपेत राहिल्याचे पुरावेच आता समोर आले आहेत. १९९९ सालीच तत्कालीन तलाठ्यांनी येथील भूखंड विक्री, ग्रामपंचायतींकडून मिळणारी ले-आऊट मंजुरी आणि त्यावर होणारी बेकायदा बांधकामे याविषयीचा सविस्तर अहवाल प्रशासनाला सादर केला होता, तसेच आत्ताच उपाययोजना न केल्यास भविष्यात अनेक समस्या निर्माण होतील, असा इशाराही या अहवालात देण्यात आला होता.शहरालगतच्या सातारा आणि देवळाई गावासाठी नुकतीच नगर परिषद स्थापन करण्यात आली आहे. राज्य सरकारने नगर परिषदेवर प्रशासक म्हणून तहसीलदारांची नियुक्ती केली. नगर परिषद अस्तित्वात येताच जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी येथील बेकायदा बांधकामांविरोधात कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार प्रशासकांनी सध्या अतिरिक्त बांधकामे पाडण्याची मोहीम हाती घेतली आहे.यामध्ये ग्रामपंचायतींकडून परवानगी घेऊन केलेली अनेक बांधकामे सर्रासपणे पाडली जात आहेत; पण ही बांधकामे होत असताना आणि प्लॉटिंगचा व्यवसाय तेजीत असताना त्याची पुरेशी कल्पना असूनही जिल्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. साताऱ्यातील प्लॉटिंगचा व्यवसाय आणि ले-आऊट मंजुरीविषयी १९९९ सालीच तत्कालीन तलाठी सतीश तुपे यांनी तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना सविस्तर अहवाल सादर केला होता.एनओसीचीही होती शिफारससातारा येथे आज जास्तीत जास्त भूखंड मोकळे आहेत. जेव्हा सर्व भूखंडांवर बांधकाम होईल तेव्हा मध्य भागातील रहिवाशांना मुख्य रोडवर येण्यासाठी आत बरेच फिरून बाहेर पडावे लागेल, तरी याबाबत ले-आऊट मंजूर करताना ग्रामपंचायत कार्यालयास मोकळी जागा व रस्त्याची मालकी आपल्या नावावर करण्याच्या सूचना देऊन समांतर रस्त्याला रस्ता मिळविणारे ले-आऊट मंजूर करण्याबाबत कळवावे, सदर बाब ग्रामपंचायत कार्यालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील असल्यास नगररचना विभागाकडून ले-आऊट मंजुरीसाठी नाहरकत घेतल्याशिवाय प्लॉट विकता येणार नाहीत, असे आदेश काढावेत असेही अहवालात म्हटले होते.