शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

४९ कर्मचाऱ्यांचे ‘डायट’कडे समायोजन

By admin | Updated: November 28, 2014 01:11 IST

उस्मानाबाद : सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत कार्यरत असणारे विषय साधन व्यक्ती आणि विशेष साधन व्यक्ती असे ४९ कर्मचाऱ्यांचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत

उस्मानाबाद : सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत कार्यरत असणारे विषय साधन व्यक्ती आणि विशेष साधन व्यक्ती असे ४९ कर्मचाऱ्यांचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (डायट) समायोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या या कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, यासाठी शिक्षकांना सातत्याने प्रशिक्षण देणे गरजेचे असते. हे लक्षात घेवूनच सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत विषय साधन व्यक्ती व विशेष साधन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी शिक्षकांच्या सतत संपर्कात राहून त्यांच्या शैक्षणिक समस्या व अपेक्षा समजून घेवून गरजेनुसार मार्गदर्शनासंबंधी उपाययोजना करणे अपेक्षित होते. आवश्यकतेनुसार शासनाकडे विहित पद्धतीने अहवाल सादर करणेही गरजेचे होते. यासाठी प्रशिक्षणेही घेणे आवश्यक होते. परंतु, हा उद्देश फारसा साध्य होताना दिसला नाही. संबंधित विभागाकडून अनेक कर्मचाऱ्यांकडे कारकुणी कामे सोपविली होती. तर काही कर्मचारी अधिकारी सांगतील ती कामे करताना दिसून येत होती. या सर्व गोंधळात संबंधित कर्मचाऱ्याचे मुख्य काम बाजुलाच राहिल्याचे प्रकर्षाने दिसून आले. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर लाखो रूपये खर्च होवूनही त्या माध्यमातून किती आऊटपूट मिळाले? संबंधित कर्मचाऱ्यांनी शासनाकडे कितीवेळा पत्रव्यवहार केला? प्रत्येक वर्षी किती शाळांना भेटी दिल्या? किती प्रशिक्षणे घेतली? हा आता संशोधनाचा भाग बनला आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करून अनेक वर्षांचा कार्यकाळ लोटल्यानंतर हा प्रकार शासनाच्या निदर्शनास आला आहे. त्यामुळेच या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून काढून आता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हे कर्मचारी ‘डायट’कडे वर्ग करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांची संख्या ४९ इतकी आहे. यामध्ये विषय साधन व्यक्ती ३६ तर विशेष साधन व्यक्तींची संख्या १३ इतकी आहे. त्यामुळे सदरील कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या नियुमानुसार दिले जाणार असल्याची माहितीही जिल्हा परिषदेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागातील सर्वशिक्षा अभियानच्या कक्षामध्ये गुरूवारी शुकशुकाट पहावयास मिळाला. येथील अनेक कर्मचाऱ्यांकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे संबंधित टेबलांचे काम ठप्प झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ होवू लागली आहे. शिक्षण विभागाच्या नियमित कर्मचाऱ्यांना संबंधित टेबलांची साधी माहितीही नसल्याने अडचणीला तोंड देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे.यापूर्वी अनेक कर्मचाऱ्यांना ‘बाबुगिरी’ची कामे करावी लागत होती. परंतु, शासनाच्या या नवीन आदेशामुळे ही कामे संपून आता संबंधितांना शाळाभेटी, शैक्षणिक चर्चा सत्र, प्रशिक्षण घ्यावी लागणार आहेत. तसेच शैक्षणिक कामकाजाचे मासिक नियोजन करून गट व शहरातील साधन केंद्रांतर्गत शाळांना शैक्षणिक मार्गदर्शन करून गुणवत्ता वाढीसाठीचे विशेष प्रकल्प राबवावे लागणार आहेत.