शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

जनजागृतीसह पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई गरजेची

By admin | Updated: April 16, 2016 01:51 IST

संतोष हिरेमठ , औरंगाबाद दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे राज्यातील गावागावांमधील लोकांचे जीवन अवघड झाले आहे. हंडाभर पाण्यासाठी लोकांची पायपीट सुरू आहे

संतोष हिरेमठ , औरंगाबाददुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे राज्यातील गावागावांमधील लोकांचे जीवन अवघड झाले आहे. हंडाभर पाण्यासाठी लोकांची पायपीट सुरू आहे. घोटभर पाण्यासाठी अनेकांचे हाल होत असताना शहरातील अनेक भागांमध्ये मात्र टंचाईची जाणीव असतानाही नागरिकांकडून पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी जनजागृती करण्याबरोबर पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात नागरिकांनी व्यक्त केले.औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीपातळीही खोल गेली आहे. शिवाय राज्यात सर्वत्र पाण्याचे भीषण संकट आहे. अशा पाणीटंचाईच्या काळात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून आवाहन आणि जनजागृती केली जाते. अनेकांनी पाणी बचतीसाठी स्वत:हून पुढाकार घेतला आहे; परंतु तरीही या ना त्या पद्धतीने अनेकांकडून पाण्याची नासाडी सुरूच असल्याचे चित्र शहरातील विविध भागांत पाहावयास मिळते. पाण्याची भीषण पाणीटंचाई असतानाही पाणीपुरवठ्याच्या वेळेत पिण्यासाठी आलेल्या पाण्याने वाहने, घर, अंगण, ओटे धुऊन पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिकेच्या दक्षता पथकाक डून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे; परंतु प्रत्यक्षात महापालिकेकडून होणारी कारवाई पुरेशी ठरत नसल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक गाव, शहरांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ लोकांवर येत आहे. कामकाज सोडून महिला, पुरुष आणि चिमुकल्यांना पाण्याची वाट पाहण्याची वेळ येत आहे; परंतु औरंगाबादेत सध्या अनेक भागांमध्ये या उलट परिस्थिती पाहावयास मिळते. शहरातदेखील काही भागांमधील नागरिकांना पाण्यासाठी गैरसोय सहन करावी लागत आहे; परंतु या सगळ्याची जाणीव असतानाही अनेकांकडून पाण्याचा योग्य वापर होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत पाणी बचतीविषयी शहरवासीयांची भूमिका आणि पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाईची गरज असून, याविषयी सर्वेक्षण करण्यात आले.