शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

जनजागृतीसह पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई गरजेची

By admin | Updated: April 16, 2016 01:51 IST

संतोष हिरेमठ , औरंगाबाद दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे राज्यातील गावागावांमधील लोकांचे जीवन अवघड झाले आहे. हंडाभर पाण्यासाठी लोकांची पायपीट सुरू आहे

संतोष हिरेमठ , औरंगाबाददुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे राज्यातील गावागावांमधील लोकांचे जीवन अवघड झाले आहे. हंडाभर पाण्यासाठी लोकांची पायपीट सुरू आहे. घोटभर पाण्यासाठी अनेकांचे हाल होत असताना शहरातील अनेक भागांमध्ये मात्र टंचाईची जाणीव असतानाही नागरिकांकडून पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी जनजागृती करण्याबरोबर पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात नागरिकांनी व्यक्त केले.औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीपातळीही खोल गेली आहे. शिवाय राज्यात सर्वत्र पाण्याचे भीषण संकट आहे. अशा पाणीटंचाईच्या काळात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून आवाहन आणि जनजागृती केली जाते. अनेकांनी पाणी बचतीसाठी स्वत:हून पुढाकार घेतला आहे; परंतु तरीही या ना त्या पद्धतीने अनेकांकडून पाण्याची नासाडी सुरूच असल्याचे चित्र शहरातील विविध भागांत पाहावयास मिळते. पाण्याची भीषण पाणीटंचाई असतानाही पाणीपुरवठ्याच्या वेळेत पिण्यासाठी आलेल्या पाण्याने वाहने, घर, अंगण, ओटे धुऊन पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिकेच्या दक्षता पथकाक डून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे; परंतु प्रत्यक्षात महापालिकेकडून होणारी कारवाई पुरेशी ठरत नसल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक गाव, शहरांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ लोकांवर येत आहे. कामकाज सोडून महिला, पुरुष आणि चिमुकल्यांना पाण्याची वाट पाहण्याची वेळ येत आहे; परंतु औरंगाबादेत सध्या अनेक भागांमध्ये या उलट परिस्थिती पाहावयास मिळते. शहरातदेखील काही भागांमधील नागरिकांना पाण्यासाठी गैरसोय सहन करावी लागत आहे; परंतु या सगळ्याची जाणीव असतानाही अनेकांकडून पाण्याचा योग्य वापर होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत पाणी बचतीविषयी शहरवासीयांची भूमिका आणि पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाईची गरज असून, याविषयी सर्वेक्षण करण्यात आले.