शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीसह पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई गरजेची

By admin | Updated: April 16, 2016 01:51 IST

संतोष हिरेमठ , औरंगाबाद दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे राज्यातील गावागावांमधील लोकांचे जीवन अवघड झाले आहे. हंडाभर पाण्यासाठी लोकांची पायपीट सुरू आहे

संतोष हिरेमठ , औरंगाबाददुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे राज्यातील गावागावांमधील लोकांचे जीवन अवघड झाले आहे. हंडाभर पाण्यासाठी लोकांची पायपीट सुरू आहे. घोटभर पाण्यासाठी अनेकांचे हाल होत असताना शहरातील अनेक भागांमध्ये मात्र टंचाईची जाणीव असतानाही नागरिकांकडून पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी जनजागृती करण्याबरोबर पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात नागरिकांनी व्यक्त केले.औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीपातळीही खोल गेली आहे. शिवाय राज्यात सर्वत्र पाण्याचे भीषण संकट आहे. अशा पाणीटंचाईच्या काळात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून आवाहन आणि जनजागृती केली जाते. अनेकांनी पाणी बचतीसाठी स्वत:हून पुढाकार घेतला आहे; परंतु तरीही या ना त्या पद्धतीने अनेकांकडून पाण्याची नासाडी सुरूच असल्याचे चित्र शहरातील विविध भागांत पाहावयास मिळते. पाण्याची भीषण पाणीटंचाई असतानाही पाणीपुरवठ्याच्या वेळेत पिण्यासाठी आलेल्या पाण्याने वाहने, घर, अंगण, ओटे धुऊन पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिकेच्या दक्षता पथकाक डून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे; परंतु प्रत्यक्षात महापालिकेकडून होणारी कारवाई पुरेशी ठरत नसल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक गाव, शहरांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ लोकांवर येत आहे. कामकाज सोडून महिला, पुरुष आणि चिमुकल्यांना पाण्याची वाट पाहण्याची वेळ येत आहे; परंतु औरंगाबादेत सध्या अनेक भागांमध्ये या उलट परिस्थिती पाहावयास मिळते. शहरातदेखील काही भागांमधील नागरिकांना पाण्यासाठी गैरसोय सहन करावी लागत आहे; परंतु या सगळ्याची जाणीव असतानाही अनेकांकडून पाण्याचा योग्य वापर होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत पाणी बचतीविषयी शहरवासीयांची भूमिका आणि पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाईची गरज असून, याविषयी सर्वेक्षण करण्यात आले.