शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

तक्रार आल्यास कारवाई !

By admin | Updated: March 19, 2015 23:55 IST

जळकोट : तालुक्यातील नगारिकांना पाणीटंचाई, जनावरांना चाराटंचाई भासू नये म्हणून प्रशासनाने तत्पर राहून काम करावे़ यासंदर्भात कुठलीही तक्रार

जळकोट : तालुक्यातील नगारिकांना पाणीटंचाई, जनावरांना चाराटंचाई भासू नये म्हणून प्रशासनाने तत्पर राहून काम करावे़ यासंदर्भात कुठलीही तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले़ येथील पंचायत समिती सभागृहात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या बैठकीत त्या बोलत होत्या़ यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम पटवारी, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मेघमाळे, प्रकल्प संचालक एस़जी़ पाटील, कार्यकारी अभियंता शेलार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ लक्ष्मण पवार, जि़प़सदस्य चंदन पाटील, शांताबाई अदावळे, पंचायत समिती सभापती वनमाला फुलारी, उपसभापती भरत मालुसरे, सदस्य सोंदरबाई सूर्यवंशी, कमलाबाई माने, गटविकास अधिकारी चंद्रशेखर रामोड, विस्तार अधिकारी एस़डी़ फड, उपविभागीय अधिकारी जी़बी़ नरवटे, तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत कापसे, पशुसंवर्धन तालुका अधिकारी डॉ़पी़एऩ धोड, पं़स़सदस्य गवळे आदी उपस्थित होते़ यावेळी विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले़ पुढे प्रतिभाताई कव्हेकर म्हणाल्या, मजुरांना गावातच काम उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामसेवकांनी कामांची मागणी करावी, त्याचबरोबर चारा-छावण्याबाबत मागणी आल्यास सर्वे करून छावण्या उभ्या करण्यात याव्यात, असेही त्या म्हणाल्या़ यावेळी चंदन पाटील यांनी अनेक शेतकऱ्यांकडे एक लाख रूपयांच्या बैलजोड्या आहेत़ हे शेतकरी आपले बैल चारा छावण्यात सोडत नाही़ त्यामुळे अशा जनावरांसाठी घरपोच मदत देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करावी, अशी मागणी केली़ प्रस्ताविक एच़आऱराठोड यांनी केले़ आभार एस़डी़ फड यांनी केले़ यावेळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते़(वार्ताहर) यावेळी प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कामाचा आढावा घेतला़ तालुक्यातील १३ गावांतील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने विहिरी अधिग्रहण व टँकर्सची मागणी पंचायत समितीकडे केली आहे़ तहसील कार्यालयात एक महिन्यापूर्वी प्रस्ताव दाखल झाले असून, अद्यापही त्यावर कार्यवाही झाली नसल्याचे सरपंच, ग्रामसेवकांनी सांगितले़