शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

जिल्ह्यातील चेकपोस्टवर विनामास्क येणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:03 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी असलेल्या सर्व चेकपोस्टवर विनामास्क येणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित ...

औरंगाबाद : जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी असलेल्या सर्व चेकपोस्टवर विनामास्क येणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सूचना केली आहे. विदर्भ, मुंबई आणि पुण्यातून, मराठवाड्यातून औरंगाबादेत रोज खासगी वाहनांतून व इतर वाहनांनी येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवण्यात येणार आहे.

विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून जिल्हा सीमांवर पुन्हा कोरोनाच्या अनुषंगाने तपासणी करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. मुंबई, पुण्याहून अमरावती, अकोल्यासह विदर्भात जाण्यासाठी व येण्यासाठी या जिल्ह्यातील नागरिकांना औरंगाबादहून मार्ग आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे चेकपोस्टवरील तपासण्या करण्यासाठी प्रशासन परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार आहे. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, जिल्ह्याच्या सीमेतून ये-जा करणाऱ्या आणि तिकडून येणाऱ्या वाहतुकीसाठी चेकपोस्ट लावण्यात येणार आहेत. प्रशासन पूर्णपणे खबरदारी घेईल. चेकपोस्टच्या तपासणीत जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येईल. मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांत रुग्ण वाढत असून सर्व जिल्ह्यातील सीमांवर वेगाने तपासणीची मोहीम राबविण्याची तयारी प्रशासनाने ठेवलेली आहे.

चौकट..

पोलीस आयुक्तांनी मागितली परवानगी

शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर आणि गर्दीसाठी कारणीभूत ठरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे विशेष अधिकारांच्या अनुषंगाने मंगळवारी एक पत्र दिले आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने बुधवारी महत्त्वाचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर ११ एप्रिलपासून कडक कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत.