शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

‘आरटीई’नुसार प्रवेश प्रक्रिया रेंगाळली

By admin | Updated: May 1, 2016 01:42 IST

औरंगाबाद : ‘आरटीई’नुसार २५ टक्के जागांवर प्रवेश घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील २ हजार २७९ पालकांनी आपल्या पाल्यांसाठी आॅनलाईन नोंदणी केली.

औरंगाबाद : ‘आरटीई’नुसार २५ टक्के जागांवर प्रवेश घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील २ हजार २७९ पालकांनी आपल्या पाल्यांसाठी आॅनलाईन नोंदणी केली. जिल्ह्यात ४३५ शाळांमध्ये ५ हजार ३६ जागांवर हे प्रवेश दिले जाणार आहेत.सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमध्येही समाजातील वंचित, आर्थिक दुर्बल घटक व अपंगांसाठी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविणे शिक्षण हक्क कायद्यानुसार बंधनकारक आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होऊ शकते. असे असले तरी अनेक शाळांनी यातून सुटका करण्यासाठी पळवाटा शोधल्या असाव्यात. पालक जेव्हा आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी संबंधित संकेतस्थळावर जातो, त्यावेळी पहिल्या १ किलोमीटरच्या अंतरावर तसेच पुढील ३ किलोमीटर अंतरावर अपेक्षित शाळाच दिसत नाहीत. अनेकदा ते संकेतस्थळ हँग होते. त्यामुळे पालकांना सायबर कॅफेवर ताटकळत बसण्याशिवाय पर्याय उरत नाही. सुरुवातीला या संकेतस्थळावर पालकांसाठी ११ ते २८ मार्चदरम्यान आॅनलाईन नोंदणीची मुदत होती. मात्र, जिल्ह्यातील अनेक शाळांनी नोंदणीच केलेली नसल्यामुळे शाळांसाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर संकेतस्थळ सतत हँग होत राहिले. अजूनही पन्नास टक्के पाल्यांची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याबाबतच्या हालचालींना शिक्षणाधिकारी कार्यालयात वेग आला आहे. शासन निर्णयानुसार शाळांची सुरुवात ज्या वर्गापासून होते तेथूनच २५ टक्क्यांनुसार प्रवेशस्तर अमलात आणला पाहिजे. शिक्षण विभागाने प्रवेशाचा पॉइंट अगोदर निश्चित करावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ऋषिकेश देशमुख, राहुल तायडे, सम्राट कटारे, अक्षय गोरे, सोनू शहा यांनी शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.