शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई’नुसार प्रवेश प्रक्रिया रेंगाळली

By admin | Updated: May 1, 2016 01:42 IST

औरंगाबाद : ‘आरटीई’नुसार २५ टक्के जागांवर प्रवेश घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील २ हजार २७९ पालकांनी आपल्या पाल्यांसाठी आॅनलाईन नोंदणी केली.

औरंगाबाद : ‘आरटीई’नुसार २५ टक्के जागांवर प्रवेश घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील २ हजार २७९ पालकांनी आपल्या पाल्यांसाठी आॅनलाईन नोंदणी केली. जिल्ह्यात ४३५ शाळांमध्ये ५ हजार ३६ जागांवर हे प्रवेश दिले जाणार आहेत.सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमध्येही समाजातील वंचित, आर्थिक दुर्बल घटक व अपंगांसाठी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविणे शिक्षण हक्क कायद्यानुसार बंधनकारक आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होऊ शकते. असे असले तरी अनेक शाळांनी यातून सुटका करण्यासाठी पळवाटा शोधल्या असाव्यात. पालक जेव्हा आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी संबंधित संकेतस्थळावर जातो, त्यावेळी पहिल्या १ किलोमीटरच्या अंतरावर तसेच पुढील ३ किलोमीटर अंतरावर अपेक्षित शाळाच दिसत नाहीत. अनेकदा ते संकेतस्थळ हँग होते. त्यामुळे पालकांना सायबर कॅफेवर ताटकळत बसण्याशिवाय पर्याय उरत नाही. सुरुवातीला या संकेतस्थळावर पालकांसाठी ११ ते २८ मार्चदरम्यान आॅनलाईन नोंदणीची मुदत होती. मात्र, जिल्ह्यातील अनेक शाळांनी नोंदणीच केलेली नसल्यामुळे शाळांसाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर संकेतस्थळ सतत हँग होत राहिले. अजूनही पन्नास टक्के पाल्यांची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याबाबतच्या हालचालींना शिक्षणाधिकारी कार्यालयात वेग आला आहे. शासन निर्णयानुसार शाळांची सुरुवात ज्या वर्गापासून होते तेथूनच २५ टक्क्यांनुसार प्रवेशस्तर अमलात आणला पाहिजे. शिक्षण विभागाने प्रवेशाचा पॉइंट अगोदर निश्चित करावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ऋषिकेश देशमुख, राहुल तायडे, सम्राट कटारे, अक्षय गोरे, सोनू शहा यांनी शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.