शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

निवडणूक आयोगाच्या निर्देशाने शहर आणि ग्रामीणमधील सुमारे १३०० शस्त्रे केली पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:17 IST

लोकसभा निवडणूक शांत व सुरक्षित वातावरणात व्हावी, याकरिता शहर पोलिसांच्या निर्देशानुसार ८०० शस्त्रपरवानाधारकांनी तर ग्रामीणमधील ४९९ व्यक्तींनी त्यांची शस्त्रे जवळच्या पोलीस ठाण्यात जमा केली.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती : विनंती अर्जानंतर दीडशे शस्त्रे स्वसंरक्षणासाठी बाळगण्यास दिली मुभा

औरंगाबाद : लोकसभा निवडणूक शांत व सुरक्षित वातावरणात व्हावी, याकरिता शहर पोलिसांच्या निर्देशानुसार ८०० शस्त्रपरवानाधारकांनी तर ग्रामीणमधील ४९९ व्यक्तींनी त्यांची शस्त्रे जवळच्या पोलीस ठाण्यात जमा केली. शस्त्रे जमा करण्यासंबंधी पोलिसांकडून नोटिसा प्राप्त झाल्यानंतर शहरातील बँका, सुवर्णपेढ्यासह जीविताला धोका असलेल्या व्यक्ती अशा सुमारे १५० जणांना शस्त्रे त्यांच्याकडे ठेवण्यास मुभा दिली. जे नागरिक नोटीस मिळाल्यानंतरही शस्त्रे जमा करणार नाहीत त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत १ हजार ३०५ जणांना पोलीस आयुक्तांकडून शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. यापैकी १ हजार ८८ नागरिक, व्यापारी प्रतिष्ठाने यांनी पिस्तूल, रिव्हॉल्व्हर अथवा बंदूक आदी प्रकारची अग्निशस्त्रे खरेदी केली आहेत. याबाबतची नोंद त्यांच्या शस्त्र परवान्यावर आहे. लोकसभा निवडणूक निर्भीड वातावरणात व्हावी, याकरिता प्रत्येक निवडणूक काळात परवानाधारकांकडून त्यांची शस्त्रे जमा करून घेतली जातात. त्यानुसार शहरातील १ हजार ३०५ परवानाधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यापैकी ८०० नागरिकांनी स्वत:हून पोलीस ठाण्यात येऊन त्यांची शस्त्रे जमा केली, तर १५० नागरिक, बँका आणि सुवर्णपेढ्याचे मालक यांनी पोलीस आयुक्तांना अर्ज करून त्यांच्या व्यवसायाच्या सुरक्षेसाठी शस्त्र त्यांच्याकडेच ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या अर्जावर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समितीसमोर चर्चा होऊन संबंधिताला खरेच शस्त्राची गरज आहे का, अथवा त्यांचा राजकीय पक्षाशी काही संबंध आहे, याबाबतची पडताळणी करण्यात आली. त्यांनतर त्यांना स्वत:जवळ शस्त्र बाळगण्यास परवानगी देण्यात आली.चौकटऔरंगाबाद ग्रामीणमधील ४९९ नागरिकांनी केली शस्त्रे जमाऔरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील ५०८ जणांना शस्त्र परवाना दिले आहे. या परवान्यावर शस्त्र खरेदी केलेल्या व्यक्तींना पोलिसांकडून शस्त्र जमा करण्यासंबंधी नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यापैकी ४९९ जणांनी आज गुरुवारपर्यंत त्यांची शस्त्रे पोलीस दरबारी जमा केली.गुन्हा दाखल होऊ शकतोपोलिसांच्या नोटिसीनंतर शस्त्रे जमा न करणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्याची कारवाई केली जाऊ शकते. मात्र, ज्या लोकांनी रीतसर अर्ज केल्यानंतर समितीच्या आदेशानंतर ज्यांना स्वत:जवळ शस्त्र बाळगण्यास परवानगी मिळाली, त्यांना कारवाईतून वगळले जाणार आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसElectionनिवडणूक