शहरं
Join us  
Trending Stories
1
शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
2
स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
3
झोंबणाऱ्या थंडीनं भरलं कापरं, उत्तर भारतात थंडीची लाट; उत्तराखंड, हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा इशारा
4
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
5
आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
6
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
7
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
8
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
9
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
10
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
11
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
12
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
13
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
14
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
15
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
16
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
17
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
18
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
19
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
20
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाच्या निर्देशाने शहर आणि ग्रामीणमधील सुमारे १३०० शस्त्रे केली पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:17 IST

लोकसभा निवडणूक शांत व सुरक्षित वातावरणात व्हावी, याकरिता शहर पोलिसांच्या निर्देशानुसार ८०० शस्त्रपरवानाधारकांनी तर ग्रामीणमधील ४९९ व्यक्तींनी त्यांची शस्त्रे जवळच्या पोलीस ठाण्यात जमा केली.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती : विनंती अर्जानंतर दीडशे शस्त्रे स्वसंरक्षणासाठी बाळगण्यास दिली मुभा

औरंगाबाद : लोकसभा निवडणूक शांत व सुरक्षित वातावरणात व्हावी, याकरिता शहर पोलिसांच्या निर्देशानुसार ८०० शस्त्रपरवानाधारकांनी तर ग्रामीणमधील ४९९ व्यक्तींनी त्यांची शस्त्रे जवळच्या पोलीस ठाण्यात जमा केली. शस्त्रे जमा करण्यासंबंधी पोलिसांकडून नोटिसा प्राप्त झाल्यानंतर शहरातील बँका, सुवर्णपेढ्यासह जीविताला धोका असलेल्या व्यक्ती अशा सुमारे १५० जणांना शस्त्रे त्यांच्याकडे ठेवण्यास मुभा दिली. जे नागरिक नोटीस मिळाल्यानंतरही शस्त्रे जमा करणार नाहीत त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत १ हजार ३०५ जणांना पोलीस आयुक्तांकडून शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. यापैकी १ हजार ८८ नागरिक, व्यापारी प्रतिष्ठाने यांनी पिस्तूल, रिव्हॉल्व्हर अथवा बंदूक आदी प्रकारची अग्निशस्त्रे खरेदी केली आहेत. याबाबतची नोंद त्यांच्या शस्त्र परवान्यावर आहे. लोकसभा निवडणूक निर्भीड वातावरणात व्हावी, याकरिता प्रत्येक निवडणूक काळात परवानाधारकांकडून त्यांची शस्त्रे जमा करून घेतली जातात. त्यानुसार शहरातील १ हजार ३०५ परवानाधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यापैकी ८०० नागरिकांनी स्वत:हून पोलीस ठाण्यात येऊन त्यांची शस्त्रे जमा केली, तर १५० नागरिक, बँका आणि सुवर्णपेढ्याचे मालक यांनी पोलीस आयुक्तांना अर्ज करून त्यांच्या व्यवसायाच्या सुरक्षेसाठी शस्त्र त्यांच्याकडेच ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या अर्जावर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समितीसमोर चर्चा होऊन संबंधिताला खरेच शस्त्राची गरज आहे का, अथवा त्यांचा राजकीय पक्षाशी काही संबंध आहे, याबाबतची पडताळणी करण्यात आली. त्यांनतर त्यांना स्वत:जवळ शस्त्र बाळगण्यास परवानगी देण्यात आली.चौकटऔरंगाबाद ग्रामीणमधील ४९९ नागरिकांनी केली शस्त्रे जमाऔरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील ५०८ जणांना शस्त्र परवाना दिले आहे. या परवान्यावर शस्त्र खरेदी केलेल्या व्यक्तींना पोलिसांकडून शस्त्र जमा करण्यासंबंधी नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यापैकी ४९९ जणांनी आज गुरुवारपर्यंत त्यांची शस्त्रे पोलीस दरबारी जमा केली.गुन्हा दाखल होऊ शकतोपोलिसांच्या नोटिसीनंतर शस्त्रे जमा न करणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्याची कारवाई केली जाऊ शकते. मात्र, ज्या लोकांनी रीतसर अर्ज केल्यानंतर समितीच्या आदेशानंतर ज्यांना स्वत:जवळ शस्त्र बाळगण्यास परवानगी मिळाली, त्यांना कारवाईतून वगळले जाणार आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसElectionनिवडणूक