शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

कागदपत्रांना मंजुरी, मगच तूर खरेदी

By admin | Updated: May 20, 2017 23:30 IST

बीड : खरेदी केंद्रावर दाखल होणारी तूर शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची यामध्ये नियमितता येण्याच्या दृष्टीने खरेदीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा, पीकपेरा आदी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे

राजेश खराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : खरेदी केंद्रावर दाखल होणारी तूर शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची यामध्ये नियमितता येण्याच्या दृष्टीने खरेदीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा, पीकपेरा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील आदी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. त्यानुसारच तुरीची खरेदी होणार आहे.जिल्ह्यात एक लाख क्विंटल तूर शिल्लक असल्याने नाफेडच्या वतीने खरेदी केंद्रांना वाढीव मुदत देण्यात आली होती. ३१ मे पर्यंत शिल्लक साठा खरेदी करावा लागणार आहे. गेल्या २८ दिवसात ६ ते ७ हजार क्विंटल तूर खरेदी झाली असून, अद्यापही शेतकऱ्यांकडे ६० हजार क्विंटल तूर शिल्लक आहे. जिल्ह्यातील १० खरेदी केंद्रे सध्या सुरू असून, कागदपत्रांच्या तपासणीसाठी अधिकचा वेळ खर्ची पडत आहे. यापूर्वी खरेदी संदर्भातील कागदपत्रांची तपासणी केंद्रांवरील अधिकारी आणि कर्मचारीच करीत होते. व्यापाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे सर्वसामान्य शेतकरी खरेदी केंद्रापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे तहसीलदारांकडूनच शेतकऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपासणीनंतर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला जाणार असून, कागदपत्रांची खातरजमा झाल्यानंतरच टोकन नंबरप्रमाणे शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना खरेदीची माहिती भ्रमणध्वनीवरून देणे कृउबातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनिवार्य राहणार आहे.मात्र, अद्यापपर्यंत जिल्ह्यात १ लाख क्विंटलहून अधिकच्या तुरीची खरेदी अनियमित पद्धतीने झाली आहे. त्यामुळे उशिराचे शहाणपण शेतकऱ्यांच्या अंगलट येण्याचे चित्र निर्माण झाले आहे.