शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अभय योजनेला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:17 IST

शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा खर्च भागविण्यासाठी महापालिकेला दरवर्षी ६० कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. त्या तुलनेत २५ ते ३० कोटी रुपयेही पाणीपट्टीपोटी मिळत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा खर्च भागविण्यासाठी महापालिकेला दरवर्षी ६० कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. त्या तुलनेत २५ ते ३० कोटी रुपयेही पाणीपट्टीपोटी मिळत नाहीत. पन्नास टक्के तोट्यात पाणीपुरवठा योजना राबवावी लागत आहे. शहरात अनधिकृत नळांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, आता हा आकडा १ लाख २४ हजारांपर्यंत पोहोचला आहे. अनधिकृत नळ अधिकृत व्हावेत यासाठी मनपा प्रशासनाने पन्नासवेळा अभय योजना राबविली. या योजनेत मोजावी लागणारी रक्कम पाहूनच नागरिक मनपाला अभयदान करायला तयार नाहीत.राज्यातील सर्वच महापालिकांना अनधिकृत नळ कनेक्शनचा प्रश्न भेडसावत आहे. नागरिकांना वारंवार आवाहन करूनही नागरिक अभय योजनेत नळ अधिकृत करून घेत नाहीत. इचलकरंजी महापालिकेने अलीकडेच १०० रुपये भरा आणि अनधकिृत नळ अधिकृत करा, अशी योजना राबविली. या योजनेला इचलकरंजीकरांनी उदंड प्रतिसाद दिला. ८० टक्के नळजोडण्या एकाचवेळी अधिकृत झाल्या. औरंगाबाद महापालिकेलाही मागील काही वर्षांपासून अनधिकृत नळांचा प्रश्न भेडसावत आहे. वर्षातून तीन ते चार वेळेस नागरिकांना आपले अनधिकृत नळ अधिकृत करून घ्यावेत, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात येतो. मनपाकडून कधीच कारवाई होत नाही, हे नागरिकांनाही उमजले आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. ४ हजार रुपये अभय योजनेचा दंड आणि चालू आर्थिक वर्षाची पाणीपट्टी म्हणून ४ हजार असे एकूण ८ हजार रुपये भरण्यास नागरिक कंटाळा करीत आहेत.एकीकडे शहरात पाण्याची मागणीही बरीच वाढली आहे. १५ लाख नागरिकांची तहान भागविण्याएवढे पाणी मनपाकडे उपलब्ध नाही. सध्या शहरात तीन दिवसाआड, कुठे चार दिवसाआड पाणी देण्यात येते. अधिकृतरीत्या नळ कनेक्शन घेण्यासाठी मनपाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांना अक्षरश: कार्यालयाचे उंबरठे झिजवायला लावतात. त्यामुळे नागरिक अनधिकृत नळ घेऊन मोकळे होतात.मनपाच्याच रेकॉर्डनुसार सध्या अधिकृत नळ कनेक्शनची संख्या १ लाख ३४ हजार आहे. अनधिकृत नळांची संख्या १ लाख २४ हजारांपर्यंत पोहोचली आहे. अनधिकृत नळ १०० रुपये भरून मनपाने नियमित केल्यास दरवर्षी ५ कोटी रुपये पाणीपट्टीत वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा योजनेत होणारा तोटाही काही प्रमाणात कमी होईल.