शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

जिल्ह्यातील दहावीच्या निकालाचे ९९.८७ टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:02 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा निकाल भरण्यास २३ जूनला ...

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा निकाल भरण्यास २३ जूनला सुरुवात झाली. २ जुलैपर्यंतच्या मुदतीत जिल्ह्यातील ९९.८७ टक्के विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी ऑनलाईन भरले. जिल्ह्यातील ९७ विद्यार्थ्यांचे निकाल भरणे अपूर्ण असून, ६०१ विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी भरले. मात्र, त्यांची ऑनलाईन निश्चिती केली नाही. तसेच ६२ हजार ७४१ विद्यार्थ्यांचे निकाल भरून निश्चिती केल्याची माहिती शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी दिली.

विभागीय शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यांत २५६० शाळांंतून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी १ लाख ७६ हजार १९३ नियमित विद्यार्थ्यांनी, तर ७ हजार ४१८ पुनर्परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. त्याच विद्यार्थ्यांचे निकाल बोर्डाकडून देण्यात येणार असल्याचे बोर्डाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील ६२ हजार ७३१ नियमित, तर २२८० पुनर्परीक्षार्थी असे एकूण ६५ हजार ११ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी ६२ हजार ७४१ विद्यार्थ्यांचे निकाल भरून निश्चिती करण्यात आली. ९७ विद्यार्थ्यांचे निकाल भरणे अपूर्ण असून, ६०१ विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी भरले, मात्र, त्यांची ऑनलाईन निश्चिती केली नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. ज्यांचे निकाल अपूर्ण व निश्चित केले नाहीत, त्या विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढ मिळते, की त्यांचे पुढे काय होणार, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. तसेच निकालाचे अभिलेखे जमा करण्याचे काम ६ जुलैपर्यंत केले जाणार आहे.

--

मुदतवाढीच्या सूचना नाहीत

विभागातील ९९ टक्केपेक्षा अधिक निकाल ऑनलाईन भरून झाले आहेत. फार थोड्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन येणे बाकी आहे. दहावी निकालाची ऑनलाईन निश्चिती व अपूर्ण राहिलेल्या कामांसाठी मुदतवाढीबाबत अद्याप राज्य मंडळाकडून कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत, असे विभागीय सचिव सुगता पुन्ने म्हणाल्या.