शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
3
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
4
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
5
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
6
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
7
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
8
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
9
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
10
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
11
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
12
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
13
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
14
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
15
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
16
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
17
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
18
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
19
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?

९९ हजार शेतकऱ्यांना मिळाले मानसिक बळ!

By admin | Updated: December 24, 2016 01:02 IST

जालना जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्हा रूग्णालयात प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे.

गजेंद्र देशमुख जालनाजिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्हा रूग्णालयात प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना समुपदेशन तसेच मानसिक उपचार करण्यात येत आहेत. गत आठ महिन्यांत ९९ हजार ६७५ शेतकऱ्यांवर मानसिक उपचार तर ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना सुमपदेशन करून मानसिक बळ मिळाले आहे.जिल्ह्यात गत काही वर्षांत दीडशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा आदींना कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली. इतर शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होऊ नये, ते मानसिकदृष्ट्या खचू नये म्हणून शासनाने प्रत्येक जिल्ह्यात प्रेरणा प्रकल्प नावाने केलेल्या उपक्रमास शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा रूग्णायालत एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान ९९ हजार ६७५ शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यांना मानसिक आधार देण्यात आला. आवश्यक असलेली तपासणी करण्यात आलेली आहे. विषारी द्रव प्राशन केलेल्या ३८५ शेतकऱ्यांना परिपूर्ण असे मानसिक समुपदेशन करण्यात आले. त्यांना विष का प्राशन केले. त्यांना कोणत्या आधाराची गरज आहे. कोणते उपचार करण्याची गरज आहे. याची माहिती घेऊन त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यात आले. थोडक्यात त्यांची मानसिक स्थिती सुदृढ करण्याचा प्रयत्न या प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे कक्षाच्या प्रमुख डॉ. एम. डी. मुळे यांनी सांगितले. अति तणावाखाली असलेल्या ३५ शेतकऱ्यांना समुपदेशन तसेच औषधोपचार करण्यात आले. मद्यपानामुळे त्रस्त असलेल्या ४५ शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याचे मुळे यांनी यावेळी सांगितले.