शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

९९ हजार शेतकऱ्यांना मिळाले मानसिक बळ!

By admin | Updated: December 24, 2016 01:02 IST

जालना जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्हा रूग्णालयात प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे.

गजेंद्र देशमुख जालनाजिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्हा रूग्णालयात प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना समुपदेशन तसेच मानसिक उपचार करण्यात येत आहेत. गत आठ महिन्यांत ९९ हजार ६७५ शेतकऱ्यांवर मानसिक उपचार तर ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना सुमपदेशन करून मानसिक बळ मिळाले आहे.जिल्ह्यात गत काही वर्षांत दीडशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा आदींना कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली. इतर शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होऊ नये, ते मानसिकदृष्ट्या खचू नये म्हणून शासनाने प्रत्येक जिल्ह्यात प्रेरणा प्रकल्प नावाने केलेल्या उपक्रमास शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा रूग्णायालत एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान ९९ हजार ६७५ शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यांना मानसिक आधार देण्यात आला. आवश्यक असलेली तपासणी करण्यात आलेली आहे. विषारी द्रव प्राशन केलेल्या ३८५ शेतकऱ्यांना परिपूर्ण असे मानसिक समुपदेशन करण्यात आले. त्यांना विष का प्राशन केले. त्यांना कोणत्या आधाराची गरज आहे. कोणते उपचार करण्याची गरज आहे. याची माहिती घेऊन त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यात आले. थोडक्यात त्यांची मानसिक स्थिती सुदृढ करण्याचा प्रयत्न या प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे कक्षाच्या प्रमुख डॉ. एम. डी. मुळे यांनी सांगितले. अति तणावाखाली असलेल्या ३५ शेतकऱ्यांना समुपदेशन तसेच औषधोपचार करण्यात आले. मद्यपानामुळे त्रस्त असलेल्या ४५ शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याचे मुळे यांनी यावेळी सांगितले.