शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

९९ हजार शेतकऱ्यांना मिळाले मानसिक बळ!

By admin | Updated: December 24, 2016 01:02 IST

जालना जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्हा रूग्णालयात प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे.

गजेंद्र देशमुख जालनाजिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्हा रूग्णालयात प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना समुपदेशन तसेच मानसिक उपचार करण्यात येत आहेत. गत आठ महिन्यांत ९९ हजार ६७५ शेतकऱ्यांवर मानसिक उपचार तर ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना सुमपदेशन करून मानसिक बळ मिळाले आहे.जिल्ह्यात गत काही वर्षांत दीडशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा आदींना कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली. इतर शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होऊ नये, ते मानसिकदृष्ट्या खचू नये म्हणून शासनाने प्रत्येक जिल्ह्यात प्रेरणा प्रकल्प नावाने केलेल्या उपक्रमास शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा रूग्णायालत एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान ९९ हजार ६७५ शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यांना मानसिक आधार देण्यात आला. आवश्यक असलेली तपासणी करण्यात आलेली आहे. विषारी द्रव प्राशन केलेल्या ३८५ शेतकऱ्यांना परिपूर्ण असे मानसिक समुपदेशन करण्यात आले. त्यांना विष का प्राशन केले. त्यांना कोणत्या आधाराची गरज आहे. कोणते उपचार करण्याची गरज आहे. याची माहिती घेऊन त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यात आले. थोडक्यात त्यांची मानसिक स्थिती सुदृढ करण्याचा प्रयत्न या प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे कक्षाच्या प्रमुख डॉ. एम. डी. मुळे यांनी सांगितले. अति तणावाखाली असलेल्या ३५ शेतकऱ्यांना समुपदेशन तसेच औषधोपचार करण्यात आले. मद्यपानामुळे त्रस्त असलेल्या ४५ शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याचे मुळे यांनी यावेळी सांगितले.