शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक निवडणुकीत ९३.९० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांच्या १८ जागांसाठी आज सकाळी आठ ते चार या वेळेत ९३.९० टक्के मतदान ...

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांच्या १८ जागांसाठी आज सकाळी आठ ते चार या वेळेत ९३.९० टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बारहाते यांनी दिली.

संदीपान भुमरे आणि किरण पाटील डोणगावकर हे याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. वैयक्तिक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज आल्याने या जागेसाठी मतदान झाले नाही.

क्रांती चौकातील विभागीय सहनिबंधक कार्यालयात दोन मतदान केंद्र व प्रत्येक तालुक्यात एक मतदान केंद्र याप्रमाणे एकूण दहा केंद्रांवर मतदान झाले. एकूण अकराशे १४ मतदारांपैकी ६४६ मतदारांनी मतदान केले. फुलंब्री मतदान केंद्रावर व औरंगाबादच्या मतदान केंद्रावर पीपीई कीट घालून दोन मतदारांनी मतदान केले.

सकाळी आठ ते दहा या वेळेत ३२१, सकाळी दहा ते बारा या वेळेत ४५९, दुपारी १२ ते २ या वेळेत २२३ व दुपारी दोन ते चार या वेळेत ४३ मतदारांनी मतदान केले.

औरंगाबाद केंद्र क्रमांक एकवर ६०.७८, केंद्र क्रमांक दोन वर ९८.९१, खुलताबाद ९७.२२ फुलंब्री - १०० टक्के , सिल्लोड - ९९.५ टक्के सोयगाव- १०० टक्के कन्नड - ९८.६२ टक्के, पैठण - १०० टक्के , गंगापूर- ९९.१७ टक्के, वैजापूर ९९.३१ टक्के याप्रमाणे एकूण मतदान झाले.

उमेदवार व नेत्यांची गर्दी

विभागीय सहनिबंधक कार्यालयातील दोन मतदान केंद्रांवर सकाळपासूनच उमेदवार, त्यांचे समर्थक व पॅनलच्या नेत्यांची गर्दी बघावयास मिळाली. शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे सुभाष झांबड सकाळपासूनच येथे तळ ठोकून होते. चंद्रकांत खैरे हे या केंद्रावर दोन तास थांबले. शेतकरी विकास पॅनलचे आ. हरिभाऊ बागडे, आ. सतीश चव्हाण, आ. अंबादास दानवे, नितीन पाटील यांच्यासह त्यांचे समर्थक उपस्थित होते. उमेदवार जगन्नाथ काळे, रवींद्र काळे, एकनाथ जाधव आदींचीही याच केंद्रावर उपस्थिती होती.

निवडणुकीत रंगत आली...

दरवेळेपेक्षा यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चांगलीच रंगात आली, अशी चर्चा ऐकावयास मिळत होती. दरवेळी निवडणूक येते कधी, जाते कधी हे समजत नव्हते. यावेळी दोन पॅनल उभी राहिल्याने निवडणुकीत रंगत भरली व आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

चौकट..

आज मतमोजणी

उद्या दिनांक २२ मार्च रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात मतमोजणी सुरू होईल. दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येईल, असे मुकेश बारहाते यांनी सांगितले.