शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

९२ हजार विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षेला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:04 IST

औरंगाबाद : विद्यापीठामार्फत पदवी अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने १६ मार्चपासून परीक्षा घेतल्या जात असून, गुरुवारपर्यंत ४४ ...

औरंगाबाद : विद्यापीठामार्फत पदवी अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने १६ मार्चपासून परीक्षा घेतल्या जात असून, गुरुवारपर्यंत ४४ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन, तर ९२ हजार ६३५ विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा दिली असून, कला व वाणिज्य विद्याशाखांचा निकाल एप्रिलअखेरपर्यंत जाहीर करण्याचा मानस कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला आहे.

कोरोना महामारीमुळे शैक्षणिक सत्रावर परिणाम झालेला आहे. गेल्या वर्षी विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने हिवाळी परीक्षा घेतल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाइन परीक्षा ही विद्यार्थ्याला विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोणत्याही महाविद्यालयात देण्याची मुभा होती. त्यामुळे गेल्या वर्षी काही विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने पेपर दिले, काहींनी एकच पेपर दोन-तीनदा दिले. अनेक विद्यार्थ्यांना ‘ओएमआर’ शीटवर परीक्षा देण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे काहींनी त्यावर पीएनआर क्रमांक लिहिलेला नव्हता. त्यामुळे सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते.

यंदा पूर्वानुभव लक्षात घेता विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयात ऑफलाइन परीक्षा देण्याची मुभा दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक पेपर एकदाच दिला. आतापर्यंत ६८ टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन, तर ३२ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली आहे. दुसरीकडे पेपरच्या दुसऱ्या दिवशी विद्यापीठाकडून महाविद्यालयांना उत्तरपत्रिका तालिका (अन्सर की) पाठविली जात असून, कोणत्याही विषयांचा कोणताही प्राध्यापक विनाविलंब उत्तपत्रिका तपासून महाविद्यालयाच्या लॉगईनवरून विद्यापीठाकडे निकाल पाठवत आहेत. त्यामुळे यावेळी परीक्षेत तांत्रिक अडचणी आल्या नाहीत आणि प्रामुख्याने कला व वाणिज्य विद्याशाखांचे निकाल एप्रिलअखेरपर्यंत जाहीर करण्यास विद्यापीठाला अडचण येणार नाही. विज्ञान शाखेचे पेपर एप्रिलपर्यंत चालणार असल्यामुळे या विद्याशाखेचा निकाल थोडा उशिराने जाहीर होईल, असे परीक्षा मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले.

चौकट.....

पेपर तपासणी परीक्षा केंद्रांवरच

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले की, यंदा परीक्षेत कसल्याही अडचणी आल्या नाहीत. पेपरही परीक्षा केंद्रांवरच तपासले जातात. पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रम अशा वेगवेगळ्या तीन पातळीवर परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मूल्यमापनाचा भार वाढणार नाही व निकालही लवकर लागेल. गेल्या वर्षी ऑनलाइन परीक्षेचा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. यावेळी आम्ही पूर्वतयारी केली होती. त्यामुळे अडचणी आल्या नाहीत.

चौकट....