शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

९२ हजार विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षेला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:04 IST

औरंगाबाद : विद्यापीठामार्फत पदवी अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने १६ मार्चपासून परीक्षा घेतल्या जात असून, गुरुवारपर्यंत ४४ ...

औरंगाबाद : विद्यापीठामार्फत पदवी अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने १६ मार्चपासून परीक्षा घेतल्या जात असून, गुरुवारपर्यंत ४४ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन, तर ९२ हजार ६३५ विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा दिली असून, कला व वाणिज्य विद्याशाखांचा निकाल एप्रिलअखेरपर्यंत जाहीर करण्याचा मानस कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला आहे.

कोरोना महामारीमुळे शैक्षणिक सत्रावर परिणाम झालेला आहे. गेल्या वर्षी विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने हिवाळी परीक्षा घेतल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाइन परीक्षा ही विद्यार्थ्याला विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोणत्याही महाविद्यालयात देण्याची मुभा होती. त्यामुळे गेल्या वर्षी काही विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने पेपर दिले, काहींनी एकच पेपर दोन-तीनदा दिले. अनेक विद्यार्थ्यांना ‘ओएमआर’ शीटवर परीक्षा देण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे काहींनी त्यावर पीएनआर क्रमांक लिहिलेला नव्हता. त्यामुळे सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते.

यंदा पूर्वानुभव लक्षात घेता विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयात ऑफलाइन परीक्षा देण्याची मुभा दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक पेपर एकदाच दिला. आतापर्यंत ६८ टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन, तर ३२ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली आहे. दुसरीकडे पेपरच्या दुसऱ्या दिवशी विद्यापीठाकडून महाविद्यालयांना उत्तरपत्रिका तालिका (अन्सर की) पाठविली जात असून, कोणत्याही विषयांचा कोणताही प्राध्यापक विनाविलंब उत्तपत्रिका तपासून महाविद्यालयाच्या लॉगईनवरून विद्यापीठाकडे निकाल पाठवत आहेत. त्यामुळे यावेळी परीक्षेत तांत्रिक अडचणी आल्या नाहीत आणि प्रामुख्याने कला व वाणिज्य विद्याशाखांचे निकाल एप्रिलअखेरपर्यंत जाहीर करण्यास विद्यापीठाला अडचण येणार नाही. विज्ञान शाखेचे पेपर एप्रिलपर्यंत चालणार असल्यामुळे या विद्याशाखेचा निकाल थोडा उशिराने जाहीर होईल, असे परीक्षा मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले.

चौकट.....

पेपर तपासणी परीक्षा केंद्रांवरच

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले की, यंदा परीक्षेत कसल्याही अडचणी आल्या नाहीत. पेपरही परीक्षा केंद्रांवरच तपासले जातात. पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रम अशा वेगवेगळ्या तीन पातळीवर परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मूल्यमापनाचा भार वाढणार नाही व निकालही लवकर लागेल. गेल्या वर्षी ऑनलाइन परीक्षेचा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. यावेळी आम्ही पूर्वतयारी केली होती. त्यामुळे अडचणी आल्या नाहीत.

चौकट....