शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

९८००० मेट्रीक टन खत मंजूर

By admin | Updated: June 2, 2014 00:50 IST

भास्कर लांडे, हिंगोली मृग नक्षत्र एका आठवड्यावर आल्याने खरीप हंगामासाठी लागणार्‍या खत बियाण्यांच्या खरेदीला सुरूवात झाली आहे.

भास्कर लांडे, हिंगोली मृग नक्षत्र एका आठवड्यावर आल्याने खरीप हंगामासाठी लागणार्‍या खत बियाण्यांच्या खरेदीला सुरूवात झाली आहे. मागील दोन वर्षांत सर्वच खतांचे भाव वाढले असताना युरियाचा भाव स्थिर आहे. म्हणून यंदा युरिया आणि डीएपी खतांच्या पुरवठ्यावर शंका उपस्थित झाल्याने तुटवड्याची शक्यता आहे. उर्वरित खतांचा तुटवडा जाणवणार नाही. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख २० हजार २६ मेट्रीकटन खताची आवश्यकात भासणार आहे; परंतु ९८ हजार खत मंजूर झाले आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ४ लाख ५२ हजार ६०० हेक्टर आहे. त्यातील ३ लाख ७९ हजार ४६८ हेक्टर लागवड लायक क्षेत्र आहे; पण ३ लाख ४० हजार ५०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र कृषी विभागाने निश्चित केले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी हिंगोलीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मागील दोन वर्षांत हिंगोलीने पावसाच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. उत्पादनाच्या बाबतीत जिल्हा गतवर्षी मागे सरकला. जिल्ह्याच्या पीक पद्धतीत मोठ्या प्रमाणात फेरबदल पहावयास मिळाले. गतवर्षीपेक्षा यंदा अधिक बदल प्रामुख्याने नगदी पिकांत पहावयास मिळणार आहेत. अगदी तसे खतांबाबत होणार नसले तरी यंदा युरिया आणि डीएपी खतांची मागणी अधिक दिसते. शासनाने जवळपास सर्वच खतांवरील सबसिडी उठविल्यामुळे मागील दोन वर्षांत खतांचे भाव वधारले आहेत. कंपन्या सोयीप्रमाणे भाववाढ करीत असल्यामुळे खत खरेदीवेळी उत्पादकांचे कंबरडे मोडत आहे; परंतु युरिया खतांवरील सबसिडी कायम ठेवल्यामुळे त्याचे भाव स्थिर आहेत. बाजारात आज पावणेतीनशे रूपयांच्या घरात युरियाचे ५० किलोचे पोते मिळत आहे. प्रत्येक पिकांच्या वाढीसाठी नत्राची उपयुक्तता असल्यामुळे युरियाची मागणी असते. म्हणून यंदाच्या खरीप हंगामासाठी २८ हजार ४६७ मेट्रीक टन खतांची प्रस्तावित मागणी आहे; पण २३ हजार ९०० मेट्रीक टन खत मंजूर झाल्याने युरिया खताचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे डीएपी खतालाही उत्पादकांची पसंती असल्यामुळे खरीप हंगामासाठी १४ हजार १२६ मेट्रीक टनाची मागणी आहे. तेवढा पुरवठा मंजूर झाला नसून या हंगामात ९ हजार ८०० मे.टन खत देण्यात येणार आहे. यंदा याही खताचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) वगळता सर्वच खतांना मागणीपेक्षा कमी मंजुरी मिळाली; परंतु एसएसपीची ८ हजार २०० मे.टनाची आवश्यकता असताना दुपटीनेच म्हणजे १६ हजार ३०० मे.टन खताची मंजुरी मिळाली आहे. उत्पादकांची मागणी असलेल्या १०:२६:२६ १२ हजार मागणी असताना ८ हजार १००, २०:२०:०० ची १० हजार २०० पैकी ६ हजार ८००, १६:२०:०:१३ ची १० हजार २०० पैकी ८ हजार २०० मेटन खतांची मंजुरी मिळाली आहे. रासायनिक खतांची दिवसेंदिवस मागणी वाढत असताना तेवढा पुरवठा होत नाही. त्यातही आवश्यक खतांचा तुटवडा प्रतिवर्षी जाणवत आहे. भाववाढीची शक्यता असल्याने आताच खत खरेदी करणे फायद्याचे राहणार आहे. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख २० हजार २६ मेट्रीक टन खताची आवश्यकता आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी २८ हजार ४६७ मेट्रीक टन खताची मागणी प्रस्तावित आहे. खरीप हंगामातील स्गििंल सुपर फॉस्फेट (एसएसपी) वगळता सर्वच खतांना कमी मंजुरी.