शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

९६ लाख २२ हजारांची वसुली रखडली

By admin | Updated: July 19, 2015 00:58 IST

लातूर : महाराष्ट्र शासनाने ग्रामपातळीवर कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी लातूर जिल्ह्यातील ६८ गावात जलस्वराज पाणीपुरवठा योजना राबविली होती़

 

लातूर : महाराष्ट्र शासनाने ग्रामपातळीवर कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी लातूर जिल्ह्यातील ६८ गावात जलस्वराज पाणीपुरवठा योजना राबविली होती़ या योजनेत गाव समितीच्या अध्यक्ष, सचिवांनी कामे न करताच निधी उचलला़ परिणामी, १ कोटी ३६ लाख ८ हजार २७० रुपयाची वसुली मोहीम प्रशासनाने सुरु केली आहे़ शिवाय, अध्यक्ष, सचिव असलेल्या ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ४१ लाख ६२ हजार ४७७ रुपयांचा बोजा त्यांच्या सातबाऱ्यावर लावण्यात आला आहे़ ५९ गावांतील अध्यक्ष सचिवांना ९६ लाख २२ हजार १४३ रुपयांच्या वसुलीबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या़ मात्र वसुली नसल्याचे समोर आले आहे़ लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु़) ६२ हजार १५४, धनेगाव ६० हजार १६२, करकट्टा ११ हजार ४९५, औसा तालुक्यातील एकंबी १ लाख ७० हजार ६०७, शिवणी (बु़) १ लाख ३५ हजार ४९८, वाघोली ५३ हजार ५४५, हसाळा २१ हजार ३५५, भंगेवाडी ५३ हजार ३७६, बिरवली १ लाख १४ हजार ३९२, निलंगा तालुक्यातील बुजरूगवाडी १ लाख ७८ हजार ५० रूपये, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी (घु़) ९१ हजार ३९२, भिंगोली २ लाख ९२ हजार ८२ रूपये, हालकी ३ लाख १६ हजार ४१७ रूपये, आनंदवाडी १ लाख ३० हजार ५९६, वेबनाळ १ लाख १४ हजार ५५४ रूपये, लक्कड जवळगा १ लाख ६२ हजार २१३, अंकुलगा (स़) २० हजार ४०० रूपये, दैठणा ८४ हजार ७९० रूपये.जळकोट तालुक्यातील मेवापूर ९५ हजार ११९, जगळपूर ६१ हजार ४२०, विराळ ९४ हजार १४२, लाळी (खु़) १ लाख ४९ हजार ३२८, गुत्ती ४३ हजार ९०८, गुत्तीतांडा ९ हजार ६४, गव्हाण ४५ हजार ९५१, जिरगा १ लाख ७२ हजार ५१०, हावरगा-डोमगाव ७ लाख ९४ हजार ७५६, उदगीर तालुक्यातील शंभू उमरगा ११ लाख ७० हजार ७०३, अवलकोंडा २ लाख १० हजार ७८७, गंगापुर १ लाख १५१, चौंडी २२ हजार ९९६, नागलगाव (ता़) ५ लाख ७३ हजार ५४६, बनशेळकी १ लाख ४९ हजार ४३१, आडोळवाडी ३ हजार ३५२, इस्लामपूर १५ हजार ७७१़ अहमदपूर तालुक्यातील परचंडा ४ लाख ५७ हजार ३०१, तळेगाव १ लाख ७० हजार ७३१ व्यस्तापूर १ लाख ७२ हजार ९५३, तांबटसांगवी ९४ हजार ६८४, नागझरी ३ लाख ७५ हजार ९४़ चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ ४ लाख ८ हजार ६०८, घारोळा १ लाख ३२ हजार ८४, महाळंग्रा १ लाख ७२ हजार ७५३़ रेणापूर तालुक्यातील वांगदरी १ लाख ५८ हजार ५४, पोहरेगाव २ लाख ५७ हजार ९२७, सारोळा ७२ हजार २०४, सय्यदपूर २५ हजार ६०६, हारवाडी ३ लाख ९ हजार ४८८ व पळशी अशा एकूण ९६ लाख २२ हजार ७९३ रुपयाची वसुली होणे बाकी आहे़ (प्रतिनिधी)जलस्वराज आंतर्गत शासनाने दिलेला कोट्यावधीचा निधी खर्चुनही या गावामध्ये परिपूर्णपणे पाणीपुरवठा यशस्वी झालेला नाही़ परिणामी या गावात जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे़ जलस्वराज्याची कामे झालेल्या गावात पुन्हा पाणीपुरवठ्याची कामे नाहीत, असे आदेश असतानाही टंचाईमुळे टँकर देण्यात आले आहे़