शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

८९७ शेतकऱ्यांनी ४७८० क्विंटल सोयाबीन बियाणे केले जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:05 IST

सिल्लोड : यावर्षी सोयाबीन पिकाखाली पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. पेरणीसाठी सोयाबीन बियाणे कमी पडेल, तसेच निकृष्ट बियाणांमुळे शेतकऱ्यांची ...

सिल्लोड : यावर्षी सोयाबीन पिकाखाली पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. पेरणीसाठी सोयाबीन बियाणे कमी पडेल, तसेच निकृष्ट बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागाने मागील खरिपात पिकविलेले सोयाबीन बियाणे जतन करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले होते. कृषी विभागाच्या अवाहनामुळे तालुक्यातील ८९७ शेतकऱ्यांनी ४७८० क्विंटल सोयाबीन बियाणे जतन करून शेतात पेरणी केले. तसेच विक्री करून पैसे मिळविले आहेत.

कपाशी पिकावरील खर्च, बोंडअळीचा हल्ला तसेच मजुरीचा प्रश्न याप्रमाणेच मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव व भावातील चढ-उतार यामुळे सोपे व सुटसुटीत असलेले सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खर्च कमी, उत्पादन चांगले व भावही मिळत असल्याने तालुक्यात यंदा सोयाबीन पेरा वाढला आहे. मागील हंगामात काही कंपन्यांनी बोगस बियाणे विक्री केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच बियाणांचा तुटवडाही जाणवला होता. यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्वत: उत्पादित केलेले सोयाबीन बियाणे म्हणून जतन करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करून ते कसे जतन करावे, याबाबत मार्गदर्शन केले होते. यामुळे तालुक्यातील सुमारे ८९७ शेतकऱ्यांनी ४७८० क्विंटल सोयाबीन बियाणे जतन केले होते. त्यापैकी २५०० क्विंटल बियाणे आठ हजार ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री केले. तर उर्वरित शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात पेरणी केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी दिली.

चौकट

सिरसाळा तांडा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सिरसाळा तांडा येथे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी जमिनीचे आरोग्य चांगले राहावे म्हणून जैविक पद्धतीचा अवलंब, जैविक संघाची बीज प्रक्रिया, नाडेप, गांडूळ खत, मकावरील लष्करी अळी नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशकांचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी डापके, कृषी सहायक सारिका पाटील, पोलीस पाटील महारू पवार, एम. बी. पाटील, विनायक परदेशी, अजय राठोड, गजानन राठोड आदी उपस्थित होते.

020721\img-20210701-wa0292.jpg

कॅप्शन

सिरसाळा तांडा येथे मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी व मान्यवर दिसत आहे