शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

११ हजारांपैकी ८ हजार लस संपल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:04 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाकडून रविवारी सायंकाळी औरंगाबाद जिल्ह्याला ३१ हजार लसींच्या डोसचा साठा देण्यात आला. त्यातील ११ हजार डोस ...

औरंगाबाद : केंद्र शासनाकडून रविवारी सायंकाळी औरंगाबाद जिल्ह्याला ३१ हजार लसींच्या डोसचा साठा देण्यात आला. त्यातील ११ हजार डोस महापालिकेच्या वाट्याला आले. सोमवारी शहरातील ३९ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. दुपारी ४ वाजेपर्यंत ८ हजार डोस संपले. मंगळवारी ३ हजार डोससाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत महापालिकेला आणखी साठा न मिळाल्यास बुधवारी लसीकरण बंद ठेवावे लागणार आहे.

शहरात अनेक दिवसांपासून लसीची टंचाई जाणवत आहे. दुसरा डोस मिळावा म्हणून हजारो नागरिक एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर धाव घेत आहेत. कोणाचे शंभर तर कोणाचे सव्वाशे दिवस लसीकरण करून उलटले आहेत. या गंभीर प्रश्नावर ‘लोकमत’ने सातत्याने प्रकाश टाकला. त्यामुळे महापालिकेला वाढीव स्वरूपात डोस मिळण्यास सुरुवात झाली. सोमवारी शहरातील ३९ केंद्रांवर सकाळी १० वाजेपासून लसीकरणाला सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर लांबलचक रांगा लागल्या होत्या. मोठ्या केंद्रांवर २०० तर लहान केंद्रांवर १५० डोस देण्यात आले होते. दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत ८ हजार डोस संपले. मंगळवारी सकाळी ३ हजार डोससाठी लसीकरण होणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले. शासनाकडून आणखी साठा मिळावा यासाठी महापालिकेने पाठपुरावा सुरू केला आहे.

दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा यादी जवळपास ८२ हजारांवर पोहोचली आहे. शहरातील खासगी रुग्णालयांकडेही लसीचा २२ हजार साठा पडून आहे. खासगी कंपन्यांमधील कर्मचारी पैसे देऊन लस घेत आहेत. दररोज ८०० ते १२०० नागरिकांना खासगी रुग्णालयांमधील लस दिली जात आहे.