शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

शेतकरी आत्महत्येचे ७६ प्रस्ताव अपात्र

By admin | Updated: May 8, 2016 23:36 IST

उस्मानाबाद : अपुऱ्या पावसामुळे मागील तीन-चार वर्षापासून जिल्ह्यात सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे़ यामुळे खरीप, रबी हंगाम हातचा

उस्मानाबाद : अपुऱ्या पावसामुळे मागील तीन-चार वर्षापासून जिल्ह्यात सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे़ यामुळे खरीप, रबी हंगाम हातचा जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे़ परिणामी डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असून, इतर समस्यांचाही सामना करावा लागत आहे़ आर्थिक विवंचनेत अडकलेल्या तब्बल २१२ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्कारला आहे़ यातील केवळ १२० जणांना शासकीय मदत मिळाली असून, उर्वरित तब्बल ७६ प्रस्ताव अपात्र ठरविल्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला काहीच मदत मिळालेली नाही़राज्यात विशेषत: मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा व परिसरात मागील काही वर्षापासून सरासरीच्या निम्म्याहून कमी प्रमाणात पाऊस पडत आहे़ अपुरा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचा प्रमुख हंगाम असलेल्या खरिपासह रबीचे पीकही शेतकऱ्यांच्या हातून जात आहेत़ मागील वर्षी तर चक्क पावसाने पाठ फिरविल्याने खरिपासह रबी हंगामही वाया गेला़ परिणामी डोक्यावरील वाढते कर्ज, मुला-मुलींचे लग्न, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे़ अनेक समस्यांचा सामना करून जीवनाला कंटाळलेल्या जिल्ह्यातील तब्बल १६४ शेतकऱ्यांनी मागील वर्षी गळफास लावून आत्महत्या केली होती़ यात सर्वाधिक २६ शेतकऱ्यांनी आॅक्टोबर महिन्यात आत्महत्या केली होती़ यात मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात ९, फेब्रुवारी महिन्यात १३, मार्च व एप्रिल महिन्यात प्रत्येकी १२, मे महिन्यात १३, जून महिन्यात ११, जुलै महिन्यात १०, आॅगस्ट महिन्यात २०, सप्टेंबर महिन्यात १२, आॅक्टोबरमध्ये २६, नोव्हेंबरमध्ये ८ तर डिसेंबर मध्ये १८ अशा एकूण १६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती़ यातील ९८ शेतकरी आत्महत्येचे प्रस्ताव मंजूर करून त्यांच्या वारसांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले होते़ तर तब्बल ६६ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले होते़चालू वर्षात आजवर तब्ब्ल ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे़ यात जानेवारी महिन्यात १३, फेब्रुवारीत ११, मार्चमध्ये ८, एप्रिल महिन्यात १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे़ चालू वर्षातील २२ प्रस्ताव पात्र ठरवून त्यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे़ तर १० प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत़ चालू वर्षात आजवर २२ लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे़ यातील बहुतांश अपात्र प्रस्तावांमध्ये शेतजमीन नावावर नसणे हेच प्रमुख कारण दाखविण्यात आले आहे़ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन नाही म्हणून त्याच्या वारसांना मदत करण्यात येत नाही़ शेतजमीन नावावर नसेल तर शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी ठरत नाही का ? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांच्या वारसांमधून वेळोवेळी उपस्थित करण्यात आला आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत करण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे ही अट रद्द करण्याची घोषणा केली होती़ ही घोषणाही हवेतच विरल्याचे चित्र आहे़ एकूणच वाढत्या दुष्काळाच्या झळा पाहता शेतकऱ्यांसमोरील प्रश्न गंभीर होत आहेत़ प्रशासनाच्या टंचाई निवारणार्थ सुरू असलेल्या उपाययोजनाही अपुऱ्या ठरत आहेत़ अशा परिस्थितीत ही अट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांसाठी त्रासदायक अशीच आहे़ त्यामुळे शासनाने शेतजमीन नावावर असण्याची अट रद्द करावी, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)