शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्येचे ७६ प्रस्ताव अपात्र

By admin | Updated: May 8, 2016 23:36 IST

उस्मानाबाद : अपुऱ्या पावसामुळे मागील तीन-चार वर्षापासून जिल्ह्यात सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे़ यामुळे खरीप, रबी हंगाम हातचा

उस्मानाबाद : अपुऱ्या पावसामुळे मागील तीन-चार वर्षापासून जिल्ह्यात सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे़ यामुळे खरीप, रबी हंगाम हातचा जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे़ परिणामी डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असून, इतर समस्यांचाही सामना करावा लागत आहे़ आर्थिक विवंचनेत अडकलेल्या तब्बल २१२ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्कारला आहे़ यातील केवळ १२० जणांना शासकीय मदत मिळाली असून, उर्वरित तब्बल ७६ प्रस्ताव अपात्र ठरविल्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला काहीच मदत मिळालेली नाही़राज्यात विशेषत: मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा व परिसरात मागील काही वर्षापासून सरासरीच्या निम्म्याहून कमी प्रमाणात पाऊस पडत आहे़ अपुरा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचा प्रमुख हंगाम असलेल्या खरिपासह रबीचे पीकही शेतकऱ्यांच्या हातून जात आहेत़ मागील वर्षी तर चक्क पावसाने पाठ फिरविल्याने खरिपासह रबी हंगामही वाया गेला़ परिणामी डोक्यावरील वाढते कर्ज, मुला-मुलींचे लग्न, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे़ अनेक समस्यांचा सामना करून जीवनाला कंटाळलेल्या जिल्ह्यातील तब्बल १६४ शेतकऱ्यांनी मागील वर्षी गळफास लावून आत्महत्या केली होती़ यात सर्वाधिक २६ शेतकऱ्यांनी आॅक्टोबर महिन्यात आत्महत्या केली होती़ यात मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात ९, फेब्रुवारी महिन्यात १३, मार्च व एप्रिल महिन्यात प्रत्येकी १२, मे महिन्यात १३, जून महिन्यात ११, जुलै महिन्यात १०, आॅगस्ट महिन्यात २०, सप्टेंबर महिन्यात १२, आॅक्टोबरमध्ये २६, नोव्हेंबरमध्ये ८ तर डिसेंबर मध्ये १८ अशा एकूण १६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती़ यातील ९८ शेतकरी आत्महत्येचे प्रस्ताव मंजूर करून त्यांच्या वारसांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले होते़ तर तब्बल ६६ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले होते़चालू वर्षात आजवर तब्ब्ल ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे़ यात जानेवारी महिन्यात १३, फेब्रुवारीत ११, मार्चमध्ये ८, एप्रिल महिन्यात १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे़ चालू वर्षातील २२ प्रस्ताव पात्र ठरवून त्यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे़ तर १० प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत़ चालू वर्षात आजवर २२ लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे़ यातील बहुतांश अपात्र प्रस्तावांमध्ये शेतजमीन नावावर नसणे हेच प्रमुख कारण दाखविण्यात आले आहे़ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन नाही म्हणून त्याच्या वारसांना मदत करण्यात येत नाही़ शेतजमीन नावावर नसेल तर शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी ठरत नाही का ? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांच्या वारसांमधून वेळोवेळी उपस्थित करण्यात आला आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत करण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे ही अट रद्द करण्याची घोषणा केली होती़ ही घोषणाही हवेतच विरल्याचे चित्र आहे़ एकूणच वाढत्या दुष्काळाच्या झळा पाहता शेतकऱ्यांसमोरील प्रश्न गंभीर होत आहेत़ प्रशासनाच्या टंचाई निवारणार्थ सुरू असलेल्या उपाययोजनाही अपुऱ्या ठरत आहेत़ अशा परिस्थितीत ही अट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांसाठी त्रासदायक अशीच आहे़ त्यामुळे शासनाने शेतजमीन नावावर असण्याची अट रद्द करावी, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)