शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७५० कोटींच्या उलाढालीची ‘दिवाळी’

By admin | Updated: November 14, 2015 00:51 IST

राजकुमार जोंधळे , लातूर दुष्काळ आणि मंदीची मरगळ झटकून आलेल्या दिवाळी सणानिमित्त विविध क्षेत्रांतील बाजारात तब्बल ७५० कोटी ४५ लाख रुपयांची उलाढाल झाली.

राजकुमार जोंधळे , लातूरदुष्काळ आणि मंदीची मरगळ झटकून आलेल्या दिवाळी सणानिमित्त विविध क्षेत्रांतील बाजारात तब्बल ७५० कोटी ४५ लाख रुपयांची उलाढाल झाली. विशेष म्हणजे वाहन, कपडे आणि सोन्या-चांदीच्या बाजारात समाधानकारक उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सर्वाधिक उलाढाल ही दुचाकी, चारचाकी वाहनांच्या बाजारात झाली असून, तब्बल ५०० कोटींची उलाढाल दसरा ते दिवाळी दरम्यान झाल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले.यंदाच्या दिवाळीत मंदीबरोबर दुष्काळाचे सावट होते. मात्र ही मंदी आणि दुष्काळाची मरगळ झटकत काही प्रमाणात बाजारपेठेत दिवाळीच्या तोंडावर गर्दी झाली. ही गर्दी ऐन दिवाळीच्या सणात मोठ्या प्रमाणावर वाढली. परिणामी, बाजारपेठेत वाहन बाजार, सराफा, कापड, फटाके, इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईलसारख्या महत्त्वपूर्ण बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली. शहरी भागात वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, ग्रामीण भागात मात्र यंदा अल्प प्रतिसाद मिळाल्याचे वाहन विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सोन्या-चांदीच्या बाजारात गरजेनुसार ग्राहकांनी दिवाळीच्या नरकचतुर्दशी आणि पाडव्यादिवशी दागिण्यांची खरेदी केली. या बाजारातील उलाढालीचा आकडा लातूर शहर आणि जिल्ह्यात ६० कोटींवर पोहोचला आहे. भुसार लाईनमध्ये यंदाच्या दिवाळीने १० कोटींची उलाढाल झाली. तर उर्वरित जिल्ह्यात १० ते १२ कोटींची उलाढाल झाल्याचे किराणा होलसेल व्यापारी असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले. विशेषत: कपड्यांचा व्यापार ऐन दिवाळीत तेजीत असल्याचे द्वारकादास शामकुमार वस्त्र दालनाचे तुकाराम पाटील यांनी सांगितले. दिवाळीच्या तोंडावर कापड बाजारात म्हणावी तशी गर्दी नव्हती. मात्र ऐन दिवाळीत ग्राहकांचा टक्का वाढला आणि ही उलाढाल शहरासह जिल्ह्यात १० कोटींवर गेली. यात रेडिमेड आणि फॅन्सी साड्या खरेदीकडे ग्राहकांचा कल होता. इलेक्ट्रॉनिक बाजारात कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब आदींची खरेदी मध्यमवर्गीय कुटुंबाकडून झाली. या बाजारात लातूर शहरासह जिल्हाभरात जवळपास ३५ लाख रुपयांच्या घरात उलाढाल झाल्याची माहिती संजोग कॉम्प्युटरचे मालक शामकुमार छगनलाल शिवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.लातूर शहरातील जिल्हाभरात किमान पाचशे मोबाईल विक्रेत्यांची दुकाने आहेत. या मोबाईल विक्रेत्यांच्या दुकानात २५ विविध कंपन्यांचे स्मार्ट फोन विक्रीसाठी आहेत. मोबाईल अत्यावश्यक गरजेची आणि संवादाची वस्तू असल्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर स्मार्ट फोन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. दिवाळीच्या सणासुदीत मोबाईल बाजार तेजीत असल्याचे दिसून आले. या मोबाईल बाजारात लातूर शहरासह जिल्ह्यात २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती नंदी मोबाईलचे संचालक रविशंकर जळकोटे यांनी दिली.