शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

७४ शाळांमध्ये ‘ऐकू ध्यानाने, लिहू आनंदाने’

By admin | Updated: August 4, 2014 00:49 IST

वाशी : तालुक्यातील जवळपास ७४ शाळांमध्ये ‘ऐकू ध्यानाने, लिहू आनंदाने’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे

वाशी : तालुक्यातील जवळपास ७४ शाळांमध्ये ‘ऐकू ध्यानाने, लिहू आनंदाने’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सदरील उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास मदत होत असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येते. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना नेहमीच कामाला अधिक प्रभावी व प्रवाही करण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांची गरज असते. शिक्षण प्रक्रिया आनंददायी व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रत्येक शाळेने किमान एक तरी उपक्रम राबविणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश शाळांकडून हा कटाक्ष पाळला जात नसल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर बीइओ कादर शेख यांनी या कामी पुढाकार घेत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे ७४ शाळांमध्ये ‘ऐकू ध्यानान, लिहू आनंदाने’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचे पालकांसोबतच शिक्षणप्रेमींतून स्वागत होत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्याना शैक्षणिक ज्ञानाबरोबर स्पर्धात्मक परीक्षेबाबत प्राथमिक धडेही मिळू लागले आहेत.विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची वृत्ती निर्माण व्हावी, मुलभूत कौशल्य प्राप्त होऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात समरस होता यावे, वाचता-लिहता यते, संख्या वाचन-लेखन व गणिती मुलभूत क्रिया करता यावे, मुलभूत कौशल्य विकसित होवून अध्यायनातील अनुशेष भरून निघावा आणि प्रभूत्व अध्यानाकडे वटचाल व्हावी या सर्व बाबींचा विचार करून हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे बीइओ शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर) उपक्रमाची उद्दिष्टेविद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमता (श्रवण, भाषण, वाचन, लेखन ) विकसित करणे.गणित विषयाची भीती दूर करणे.गणिाततील मुलभूत क्रियांची दैनंदिन व्यवहाराशी सांगड घालणे.इंग्रजी विषयाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करून त्याच्या आकलन क्षमतेनुसार त्यांची इंग्रजी विषयाची संपादणूक पातळी वाढवणे.श्रुतलेखन व गणिती क्रियामध्ये आवड निर्माण करणे.अप्रगत विद्यार्थ्यांमध्ये श्रुतलेखनासाठी आत्मविश्वास निर्माण करणे.अचूकतेकडून विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुधारण्याकडे घेऊन जाणे.सहकार्य व समन्वयाची भावना वाढवणे.शालेय वेळापत्रकाप्रमाणे परिपाठ पूर्ण झाल्यानंतर १०.३० ते १०.४५ या वेळेत सदर उपक्रम दररोज १५ मिनिटे प्रत्येक वर्गात घेतला जातो.उपक्रमाच्या शालेय स्तरावरील नोंदीनुसार कालावधी पूर्ण झाल्यांनतर मुल्यमापन व उपक्रमाचे निष्कर्ष काढले जाणार आहेत.शिक्षकांनी ठेवावयाचे अभिलेखे व दैनंदिन टाचण वहीमध्ये सुरूवातीस एका ओळीचे (शब्द उदाहरणे) नोंद करण्यात येणार आहे. तसेच सातत्यपूर्ण सर्वंकष नोंदवहीच्या शेवटच्या पानावर विद्यार्थ्यांचे केवळ गुण घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्याचे लेखन व उदाहरणे शिक्षकांनी अथवा गटप्रमुख विद्यार्थ्यांकडून नियमित तपासण्यात येणार आहे.