शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

७० कोटींचा फटका

By admin | Updated: December 12, 2014 00:55 IST

औरंगाबाद : तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याने विकासकामांवरील खर्चाला ४० टक्क्यांपर्यंत कात्री लावावी लागणार असल्याचे राज्य सरकारतर्फे नुकतेच जाहीर केले आहे.

औरंगाबाद : तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याने विकासकामांवरील खर्चाला ४० टक्क्यांपर्यंत कात्री लावावी लागणार असल्याचे राज्य सरकारतर्फे नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे यंदाच्या जिल्हा वार्षिक योजनेतील अनेक कामे रद्द करावी लागणार आहेत. चालू वर्षाच्या २०५ कोटी रुपयांच्या योजनेपैकी आतापर्यंत जिल्हा प्रशासनाला अवघा ११५ कोटी रुपयांचाच निधी प्राप्त झाला आहे. यापुढच्या टप्प्यातील किती निधी मिळेल हे अद्याप अनिश्चित आहे.राज्य सरकारने सन २०१४-१५ सालासाठी २०५ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेला मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार वार्षिक योजनेत विविध कामांची तरतूद करण्यात आली. ग्रामीण भागातील रस्तेबांधणी आणि दुरुस्ती, आरोग्य केंद्र आणि शाळांच्या इमारतींचे बांधकाम, ग्रामविकासाच्या योजना, अपारंपरिक ऊर्जा विकास, सामान्य सेवा, पाटबंधारे व पूरनियंत्रण आदी कामांचा यात समावेश होता. त्यानुसार राज्य सरकारने एप्रिल २०१४ पासून नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्याला ११५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. वार्षिक योजनेत नमूद सर्व विकासकामे मार्गी लावण्यासाठी आणखी ९० कोटी रुपयांची गरज आहे. या वार्षिक योजनेचा कालावधी संपण्यासाठी तीनच महिने शिल्लक आहेत. दुसरीकडे राज्य सरकारने नुकतेच विकासकामांवरील खर्चाला ४० टक्क्यांपर्यंत कात्री लावावी लागणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित विकासकामे रद्द करावी लागणार आहेत. उर्वरित ९० कोटींपैकी निम्माही निधी मार्चपर्यंत आला तरी वार्षिक योजनेतील सुमारे २५ टक्के कामे रद्द करावी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.