शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांत ६७ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:56 IST

जिल्ह्यात सात महिन्यांमध्ये ६७ शेतकºयांनी आत्महत्येसारखा अखेरचा पर्याय निवडला असून मागील काही वर्षांपासून सुरु असलेले आत्महत्येचे सत्र यावर्षी देखील सुरुच असल्याचे दिसत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात सात महिन्यांमध्ये ६७ शेतकºयांनी आत्महत्येसारखा अखेरचा पर्याय निवडला असून मागील काही वर्षांपासून सुरु असलेले आत्महत्येचे सत्र यावर्षी देखील सुरुच असल्याचे दिसत आहे.दोन वर्षापूर्वी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. अनियमित आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस होत असल्याने शेती तोट्यात गेली. तीन वर्षापूर्वी तर खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेतकºयांना उत्पन्न मिळाले नाही. मागील वर्षी बºयापैकी पाऊस झाल्याने येथील कृषीक्षेत्रात समाधानाचे वातावरण असले तरी नापिकी, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे शेतकºयांच्या होणाºया आत्महत्या थांबल्या नसल्याचे दिसत आहे.यावर्षी देखील प्रत्येक महिन्यात किमान ४ पेक्षा अधिक शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे यावर्षी सुरुवातीच्या काळात बºयापैकी पाऊस झाला. परंतु, त्यानंतर पावसाने दडी मारली. परिणामी शेतकºयांच्या चिंता वाढत गेल्या आहेत. यावर्षीची स्थिती आणखीच गंभीर आहे. जानेवारी महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत जिल्ह्यातील ६७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी ४८ शेतकºयांच्या आत्महत्या शासनाच्या मदतीला पात्र ठरल्या आहेत. आणखी तीन प्रकरणे प्रलंबित आहेत. एकूण शेतकºयांच्या आत्महत्येच्या संख्येवरुन मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षीही परिस्थिती बदलली नसल्याचे दिसत आहे.