शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

६ हातगाडे,२८ वाहनांवर उगारला कारवाईचा बडगा !

By admin | Updated: July 16, 2016 01:12 IST

उमरगा : ‘बेलगाम वाहतुकीमुळे उमरग्यात वाढले अपघात’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध करताच पोलीस प्रशासनाने अवैधरित्या वाहतूक करणारी

उमरगा : ‘बेलगाम वाहतुकीमुळे उमरग्यात वाढले अपघात’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध करताच पोलीस प्रशासनाने अवैधरित्या वाहतूक करणारी २८ वाहने व सहा हातगाड्यांविरूद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला.उमरगा शहरातून जाणाऱ्या महामार्गावर रिक्षा टमटम, दुचाकी बेशिस्तपणे उभी केली जातात. एवढेच नाही तर जड वाहनेही रस्त्यावर कुठेही उभी करण्यात येतात. त्यामुळे हे थोडके म्हणून की काय, फळे, भाजी, कपडे विक्रेतेही हातगाडे महामार्गवर उभे करतात. दुचाकींचीही बेशिस्तपणे पार्किंग केली जात आहे. त्यामुळे उमरगेकर प्रचंड त्रस्त झाले झाले आहेत. दरम्यान, धूम स्टाईलने दुचाकी चालविणाऱ्यांविरूद्ध कुठल्याही स्वरूपाची कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे विशेषत: पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. दरम्यान, हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने ‘बेलगात वाहतुकीमुळे उमरग्यात वाढले अपघात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. शुक्रवारी सकाळपासून बेशिस्त वाहनधारक तसेच गाडेधारकांविरूद्ध कारवाई करण्यास सुरूवात केली. या मोहिमेदरम्यान एक -दोन नव्हे, तर तब्बल २८ वाहनधारकांविरूद्ध मोटार अधिनियम कलम १२२/१७७ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे रहदारीस अडथळा ठरणाऱ्या सहा हातगाडेधारकांवर मुंबई अधिनियम कलम १०२/११७ कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले. सदरील कारवाईमुळे मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला. सदरील कारवाईबाबात नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले. (वार्ताहर) कंत्राटदारांच्या हिताची काळजी?पालिकेच्या कंत्राटदाराकडून अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांकडूनही कर घेतला जातो. त्यामुळेच पालिका प्रशासनाकडून अशा व्यवसायिकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला जात नाही, असा आरोप नागरिकांतून होत आहे. पालिकेला नागरिकांच्या हितापेक्षा कंत्राटदाराच्या हिताचीच अधिक काळजी असल्याचा आरोपही होत आहे.बेलगाम वाहनधारकांमुळे नागरीक प्रचंड त्रस्त आहेत. शुक्रवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई केल्यातुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला खरा. परंतु, दोन-तीन दिवसानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने सदरील कारवाईत सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.