शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

५५० शिक्षक रजेवर !

By admin | Updated: January 17, 2017 22:49 IST

लातूर : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील चार उमेदवार रिंगणात आहेत

लातूर : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील चार उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे या उमेदवारांचे समर्थक म्हणून शेकडो शिक्षक औरंगाबादला गेले असून, जिल्ह्यातील जवळपास ५५० शिक्षकांनी रजा घेऊन उमेदवारांच्या शक्तीप्रदर्शनात सहभागी होण्यासाठी शाळेला दांडी मारली आहे.लातूर जिल्ह्यात माध्यमिकच्या ६३१ शाळा आहेत. तर ७ हजार ५४३ शिक्षकांची संख्या आहे. बहुतांश शिक्षक कोणत्या ना कोणत्या शिक्षक संघटनेत आहेत. या संघटनांचा काही उमेदवारांना पाठिंबा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५५० शिक्षक रजेवर आहेत. शाळा बुडवून शिक्षकांनी प्रचारात सहभागी होऊ नये, असे निर्देश दिले असतानाही ५५० शिक्षकांनी रजा घेतली आहे. रजेचा अधिकार अबाधित ठेवून निवडणूक आयोगाचे हे निर्देश आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या शक्तीप्रदर्शनात सहभागी होण्यासाठी हे शिक्षक औरंगाबाद सहलीवर आहेत. लातूर जिल्ह्यातील या निवडणुकीसाठी चार उमेदवार आहेत. त्यात विद्यमान आमदार विक्रम काळे, शिक्षक काँग्रेसचे राज्याध्यक्ष कालिदास माने, भारिप-बहुजन महासंघाचे प्रा. भालचंद्र येडवे, कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. संग्राम मोरे यांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वाधिक शिक्षक लातूर जिल्ह्यातून औरंगाबादला गेले असल्याचे बोलले जात आहे. जी शाळा सहा शिक्षकांची आहे, त्या शाळेत दोनपेक्षा अधिक शिक्षकांना रजा देऊ नये, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. या आदेशाचे पालन करून शिक्षक संघटनांचे पदाधिकारी रजा घेऊन उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी औरंगाबादेत गेले असल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)